
Pune : राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट तीव्र होत असताना, पुण्यातही तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील तापमान ४० अंशांच्या आसपास राहिले असून, उपनगरांमध्ये ते ४१ अंशांपुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. पुढील दोन दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी दहापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते आणि दुपारनंतर बाहेर पडणे कठीण होत आहे. मंगळवारीही अशीच परिस्थिती होती. सकाळचा गारवा पूर्णपणे कमी झाला असून, नऊ वाजल्यानंतर ऊन झपाट्याने वाढत आहे. सरकारी सुट्टीमुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळल्याने दुपारी रस्त्यांवर तुलनेने शांतता दिसून आली. संध्याकाळी ऊन कमी झाले तरी हवेत उकाडा कायम राहिला. मध्यवर्ती भागांच्या तुलनेत उपनगरांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवली असून, तापमानात २ ते ३ अंशांचा फरक नोंदवला गेला. पुढील दोन दिवसांत दिवसासोबतच रात्रीचाही उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या वाढत्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांच्या संरक्षणासाठी तीन मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केल्या आहेत. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगार, खाणकामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
पहिल्या एसओपीमध्ये रस्त्यावर काम करणारे विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कर्मचारी आणि रिक्षाचालक यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाच्या यलो, ऑरेंज आणि रेड अलर्टनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पुरेशी विश्रांती, पाण्याची उपलब्धता, ओआरएस वितरण, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा बळकट करणे यावर भर देण्यात आला आहे.
दुसरी एसओपी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण कामगारांसाठी असून, उष्णतेचा ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये थंड विश्रांती केंद्रे, पुरेसा पाणीपुरवठा, योग्य वायुवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन, उष्णतेशी संबंधित आजारांची ओळख आणि महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे.
तिसऱ्या एसओपीमध्ये उष्णतारोधक गृहनिर्माणावर भर देण्यात आला आहे. अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे घरांची उष्णतारोधक क्षमता वाढवणे, थंड छप्पर (कूल रूफ), हरित क्षेत्रांचा विकास आणि हवामान-संवेदनशील शहरी नियोजन यांचा समावेश करण्यात आला आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



