सर्व सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगान ‘जन, गण, मन’ च्या आधी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चं गायन बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी सकाळी वंदे मातरम् संबंधी नवीन नियम जारी केले आहेत. नव्या नियमानुसार वंदे मातरम् लागल्यानंतर सर्व लोकांना जागेवर उठून उभं रहावं लागेल. पद्म अवॉर्ड सारख्या नागरी पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळी राष्ट्रगीत लावावं लागेल. सिनेमा हॉल सारख्या सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ वाजवावं लागेल. वंदे मातरम् मध्ये सर्व सहा कडवी वाजवावी लागणार आहेत. 1937 साली काँग्रेसने हटवलेल्या चार कडव्यांचाही समावेश करण्यात आलाय.
वंदे मातरम् संबंधी केंद्र सरकारच्या या नव्या नियमांना MIM चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि इंडिया मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शोएब जमई यांनी विरोध केला आहे. त्यांनी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट करुन म्हटलय की, “वंदे मातरम् राष्ट्र गीत नाहीय तसच ते संविधानाचा भागही नाहीय. लोक आपल्या आस्थेने मर्जीने गायचे. पण भाजप आणि RSS ने या गीताला प्रोपेगेंडा बनवलय. त्यांना जबरदस्ती आमच्यावर लादायचं आहे. मग ऐका, आमच्या मानेवर सुरी ठेवली तरी आम्ही नाही गाणार” केंद्र सरकारने राज्य आणि दुसऱ्या सरकारी संस्थांना दिलेल्या निर्देशानुसार, कुठल्याही सरकारी कार्यक्रमात राष्ट्रगान जन गण मनच्या आधी राष्ट्र गीत वंदे मातरम् च गायन करावं लागेल.
निर्देश काय आहेत?
बंकिम चंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम् हे राष्ट्र गीत म्हणून मानलं जातं. राष्ट्रपतींच्या येण्या-जाण्याच्यावेळी, औपचारिक सरकारी कार्यक्रमात, राष्ट्रपतींनी ऑल इंडिया रेडिओ आणि टेलीविजनवरुन देशाला संबोधित करण्याच्या आधी आणि नंतर राज्यपाल किंवा लेफ्टिनेंट राज्यपाल येण्या-जाण्याच्यावेळी, राष्ट्रीय परेडमध्ये वंदे मातरम् गायन करावं असे निर्देश दिले आहेत.
वंदे मातरम ना राष्ट्रीयगान है और ना ही संविधान का हिस्सा. लोग अपनी आस्था के अनुसार मर्जी से गाते थे.मगर भाजपा RSS ने इस गीत को प्रोपेगेंडा बना दिया. वह हम पर जबरन इसे थोपना चाहते हैं. तो फिर सुनो,हमारी गर्दन पर छुरी भी रख दोगे तब भी हम नहीं जाएंगे.
— Dr. Shoaib Jamai (@shoaibJamei) February 11, 2026
शाळांसाठी काय नियम?
सर्व शाळांमध्ये दिवसाची सुरुवात राष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने करता येऊ शकते. तसचं विद्यालय व्यवस्थापनाने राष्ट्र गीत आणि राष्ट्र गान लोकप्रिय करण्यासाठी तसच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय ध्वजाप्रती सन्मानाची भावना विकसित करण्यासाठी पर्याप्त व्यवस्था करावी. औपचारिक नसलेल्या प्रसंगी सुद्धा तुम्ही राष्ट्र गीत गाऊ शकता. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ 150 वर्ष साजरी केली जात आहेत.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



