“भूक लागतेय बाळा? मला फक्त थोडा वेळ दे. मी पटकन गाजर व बीन्स आपल्या घरच्या बागेत उगवलेल्या पालकसोबत मिसळून छानशी भाजी बनवते, जी तू तुझ्या पोळीसोबत खूप आवडीने खाशील.’ मी एकदा स्वयंपाकघरात माझ्या आईला असे म्हणताना ऐकले होते. दिवाणखान्यातून मी मावशीला पाहू शकत होतो, ज्या त्यांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या दोन महिन्यांत आमच्याकडे राहायला आल्या होत्या. त्या स्वयंपाकघरात एका खुर्चीवर पसरून गाढ झोपेत होत्या. मी आईला विचारले, “तू कुणाशी बोलत आहेस, मावशी तर गाढ झोपेत आहेत?’ आई म्हणाली, “तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि त्या छोट्या बाळासोबत चाललेल्या माझ्या संभाषणात अडथळा आणू नकोस. मावशी झोपलेल्या नाहीत. त्यांना अनकम्फर्टेबल वाटत आहे व त्या फक्त डोळे मिटून बसल्या आहेत.’ मी पुन्हा वाचायला गेलो व आई स्वयंपाक करताना त्याची रेसिपीदेखील मोठ्याने बोलून सांगत राहिली. मला हे संभाषण एका तरुण आईच्या घरी गेल्यावर आठवले. ती तिच्या मुलाच्या मागे पळत म्हणत होती, “प्लीज, तुझी भाजी खाऊन घे, मग मी कार्टून लावून देईन.’ आजकाल बहुतांश तरुण पालक अशा दृश्याशी परिचित असतील, ज्यामध्ये माता याच प्रकारे आपल्या मुलांची मनधरणी करतात. जेव्हा मला हसू आवरले नाही तेव्हा ती म्हणाली, “काका, लहानपणी तुम्हीसुद्धा तुमच्या पालकांना भाजी खाण्यासाठी असेच त्रास देत असाल.’ तेव्हा मी तिला वरील प्रसंग सांगितला. तिने विचारले, “तुमची आई कुणाशी बोलत होती?’ मी म्हणालो, “आमच्या काळात मुलांना भाज्यांची आवड निर्माण करण्याची सुरुवात कदाचित त्यांच्या जन्माआधीच व्हायची!’ आणि केवळ भाज्याच नाही, तर कर्नाटकी संगीत गाणे, गोष्टी सांगणे आणि पौराणिक पुस्तके मोठ्या आवाजात वाचून दाखवणे हादेखील गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांतील दिनचर्येचा भाग असायचा. कारण आमच्या पालकांचा असा विश्वास होता की मुलांच्या आवडी-निवडी त्यांच्या जन्मापूर्वी, गर्भातच आकार घेऊ लागतात. आधुनिक पालक, कपाळावर आठ्या आणून काही बोलण्याचा प्रयत्न करू नका. आधी मला माझे म्हणणे समजावून सांगू द्या. आमच्या एकत्र कुटुंबात माझी काही चुलत-मावस भावंडं एक तर आमच्या घरात जन्माला आली होती, किंवा त्यांच्या जन्मापूर्वीच्या शेवटच्या दोन महिन्यांत माझी आई त्यांच्या घरी जाऊन राहिली होती. मी माझ्या सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे. आम्हाला भाज्या व दही आवडते, कर्नाटकी संगीत प्रिय आहे. आमच्यापैकी बहुतेकांना अनेक भाषा- ज्यामध्ये संस्कृतचाही समावेश आहे- आणि कथा सांगण्याची कला अवगत आहे. हा गुण माझ्या आईमध्येही होता. यूकेमधील डरहम विद्यापीठाच्या प्रा. नादजा रीसलँड यांनी नेमक्या याच विषयावर संशोधन केले आहे व त्यांना असे आढळून आले की, गर्भात असताना ज्या भाज्यांच्या वासाशी मुलांचा वारंवार परिचय करून दिला जातो, त्यांच्या जन्मानंतर त्या भाज्यांबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देण्याची शक्यता कमी असू शकते. रीसलँड यांनी मान्य केले, “आमच्या संशोधनावर आधारित आम्ही असे म्हणू शकतो की गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात एखाद्या विशिष्ट चवीच्या संपर्कात आल्याने मुलांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या चवीच्या स्मृती तयार होऊ शकतात, ज्या जन्मानंतर अनेक वर्षांपर्यंत त्यांच्या अन्नाच्या आवडीवर प्रभाव टाकू शकतात.’ त्या पुढे म्हणाल्या, “जर गर्भाला खाण्यापिण्याच्या काही सवयी लावून दिल्या, तर पुढे जाऊन ते मूल सकस आहार घेण्यामध्ये अधिक रस घेऊ शकते.’ या अभ्यासात फ्रान्स, नेदरलँड्स, केंब्रिज व ॲस्टन विद्यापीठाचे संशोधकदेखील सहभागी होते. ॲस्टन विद्यापीठाने या कार्यक्रमाला अर्थसाहाय्य दिले होते. जेव्हा मी सह-लेखकांपैकी एकाची ही टिप्पणी वाचली की “हे निष्कर्ष खाण्यापिण्याच्या सुरुवातीच्या हस्तक्षेपांबद्दल विचार करण्याचे नवीन मार्ग खुले करतात’, तेव्हा मला माझे पालक व घरातील ज्येष्ठांचा खूप अभिमान वाटला, ज्यांना कदाचित खूप आधीच ही गोष्ट माहीत होती. बहुधा त्यांनी ही शिकवण त्या प्रसिद्ध कथेवरून घेतली असावी, ज्यामध्ये अभिमन्यू आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूह भेदायला शिकतो. असे नवीन संशोधन आपल्या जुन्या परंपरांबद्दल नवीन रस निर्माण करते. फंडा असा आहे की, आपल्या ज्येष्ठांच्या काही परंपरा कदाचित आज लोकांच्या कपाळावर आठ्या आणत असतील, पण त्यांनी आपले काही नुकसान तर केले नाही. मग आजच्या तरुण गरोदर मातांसाठी किमान अन्नाशी संबंधित ती परंपरा अवलंबण्यात काय गैर आहे? या विषयावर तुमचे मत मला नक्की लिहून पाठवा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel





https://shorturl.fm/xCJnw