भारत-अमेरिकेत जशी ट्रेड डील झालीय, तशीच काल बांग्लादेश-अमेरिकेतही ट्रेड झालीय. पण बांग्लादेशसोबतच्या अमेरिकेच्या ट्रेड डीलमुळे भारताला एका महत्वाच्या उद्योगात मोठा फटका बसू शकतो. भारतातून अमेरिकेला मोठ्या प्रमात मस्त्य उत्पादनं, ज्वेलरी, हिरे, मसाले तसेच कपड्याची निर्यात होते. यात बांग्लादेशसोबतच्या करारामुळे भारताच्या अमेरिकेतील कपडा निर्यातीच्या महत्वकांक्षेला फटका बसू शकतो. नव्या करारानुसार अमेरिकेने बांग्लादेश वस्तुंवरील टॅरिफ 19 टक्के केलाय. भारताच्या टॅरिफपेक्षा हा 1 टक्का जास्त आहे. भारतीय वस्तुंवर 18 टक्के टॅरिफ आहे. अमेरिका बांग्लादेश करारात एक असं कलम आहे, त्यामुळे बांग्लादेशच्या कपडा निर्यातीला मोठा बूस्ट मिळू शकतो.
विश्लेषकांनुसार, बांग्लादेश-अमेरिका ट्रेड डीलमधून बांग्लादेशच्या कपडा निर्यातीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. बांग्लादेशला निर्यातीतून जो महसूल मिळतो, त्यात 80 टक्क्यापेक्षा जास्त वाटा कपडा उद्योगाचा आहे. बांग्लादेशात 40 लाख लोक कपडा उद्योगात काम करतात. यात महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये कपडा उद्योगाचा वाटा 10 टक्के आहे.
करारात अशी काय तरतूद?
या करारात एक अशी तरतूद आहे, त्यानुसार बांग्लादेशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या काही ठराविक कपड्यांवर शून्य टॅरिफ लागणार आहे. भारतीय कपडा उद्योगासाठी ही तरतूद चिंता वाढवणारी आहे. “अमेरिकेतून आयात केलेलं कॉटन आणि सिंथॅटिक फायबर यापासून बनवलेल्या रेडीमेड कपड्यांवर अमेरिकेत शून्य टॅरिफ लागेल अशी या करारात तरतूद आहे” असं बांग्लादेशच्या व्यापार सचिवाने सांगितलं. अमेरिकेचं 118 अब्ज डॉलरचं कपडा आणि वस्त्र आयातीचं मार्केट आहे. भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कपडा निर्यात होते. जवळपास 10.5 अब्ज डॉलर्स कपड्याची निर्यात होते. बांग्लादेशच्या कपडा निर्यातीसाठी असलेल्या या विशेष तरतुदीचा भारताला मोठा फटका बसू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय होता?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी रेसिपोकल टॅरिफनुसार भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सामानावर 25 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. त्यामुळे भारतीय सामानावर एकूण 50 टक्के टॅरिफ होता. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो,त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या पैशातून रशियाला युद्ध सुरु ठेवण्यासाठी ताकद मिळते, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा होता. म्हणून भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला होता.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



