T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यांचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड काय? जाणून घ्या Image Credit source: Asian Cricket Council
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चांगली सुरूवात केली आहे. दोन्ही संघांनी सुरूवातीचे सामने जिंकले आहेत. त्यामुळे तिसरा सामना सुपर 8 फेरीचं दार उघडणार आहे. दोन्ही संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नवव्यांदा भिडणार आहेत. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ आठवेळा भिडले आहेत. यात भारताने सात वेळा, तर पाकिस्तानने भारताला एकदा मात दिली आहे. 2021 मध्ये दुबई येथे झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 10 राखून पराभव केला होता. चला जाणून घेऊयात आतापर्यंतचा रेकॉर्ड काय ते…
2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमनेसामने आले होते. साखळी फेरीत भारताने बॉल आउटमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तर अंतिम फेरीत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानला पराभूत करत पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. 2012 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आमनेसामने आले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 128 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 17 षटकांत फक्त 2 गडी गमावून सहज विजय मिळवला होता. हा स्पर्धेतील भारताचा तिसरा विजय होता.
टी20 वर्ल्डकप 2014 स्पर्धेत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 130 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 18.3 षटकांत 3 गडी गमावून विजय मिळवला. 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ ईडन गार्डन्सवर भिडले होते. तेव्हा 18 षटकात पाकिस्तानने 118 धावा केल्या. हे लक्ष्य भारताने 4 गडी गमवून 15.5 षटकात पूर्ण केलं.
टी20 वर्ल्डकप 2021 स्पर्धेत भारताला पहिल्यांदा पाकिस्तानकडून धोबीपछाड मिळाला. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानने 10 गडी राखून जिंकलं. त्यानंतर भारताने 2022 स्पर्धेत या पराभवाचा वचपा काढला. पाकिस्तानने 159 धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारताने शेवटच्या चेडूंवर रोमहर्षक विजय मिळवला. 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हा आमनेसामने आले होते. तेव्हा भारताचा डाव फक्त 119 धावांवर आटोपला. हा सामना भारत गमवेल अशीच स्थिती होती. पण पाकिस्तानला सर्व गडी गमवून 113 धावा करता आल्या. हा सामना भारताने 6 धावांनी जिंकला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




