T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यांचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड काय? जाणून घ्या Image Credit source: Asian Cricket Council
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चांगली सुरूवात केली आहे. दोन्ही संघांनी सुरूवातीचे सामने जिंकले आहेत. त्यामुळे तिसरा सामना सुपर 8 फेरीचं दार उघडणार आहे. दोन्ही संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नवव्यांदा भिडणार आहेत. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ आठवेळा भिडले आहेत. यात भारताने सात वेळा, तर पाकिस्तानने भारताला एकदा मात दिली आहे. 2021 मध्ये दुबई येथे झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 10 राखून पराभव केला होता. चला जाणून घेऊयात आतापर्यंतचा रेकॉर्ड काय ते…
2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमनेसामने आले होते. साखळी फेरीत भारताने बॉल आउटमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तर अंतिम फेरीत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानला पराभूत करत पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. 2012 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आमनेसामने आले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 128 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 17 षटकांत फक्त 2 गडी गमावून सहज विजय मिळवला होता. हा स्पर्धेतील भारताचा तिसरा विजय होता.
टी20 वर्ल्डकप 2014 स्पर्धेत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 130 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 18.3 षटकांत 3 गडी गमावून विजय मिळवला. 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ ईडन गार्डन्सवर भिडले होते. तेव्हा 18 षटकात पाकिस्तानने 118 धावा केल्या. हे लक्ष्य भारताने 4 गडी गमवून 15.5 षटकात पूर्ण केलं.
टी20 वर्ल्डकप 2021 स्पर्धेत भारताला पहिल्यांदा पाकिस्तानकडून धोबीपछाड मिळाला. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानने 10 गडी राखून जिंकलं. त्यानंतर भारताने 2022 स्पर्धेत या पराभवाचा वचपा काढला. पाकिस्तानने 159 धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारताने शेवटच्या चेडूंवर रोमहर्षक विजय मिळवला. 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हा आमनेसामने आले होते. तेव्हा भारताचा डाव फक्त 119 धावांवर आटोपला. हा सामना भारत गमवेल अशीच स्थिती होती. पण पाकिस्तानला सर्व गडी गमवून 113 धावा करता आल्या. हा सामना भारताने 6 धावांनी जिंकला.
शहर
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- "ओला, उबर आणि रॅपिडोच्या मनमानीला लगाम: महाराष्ट्र सरकारचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; आता नियमांचे पालन अनिवार्य"
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
गुन्हा
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय
- पंख उधार घेऊन भरारी घेता येत नाही; आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी स्वदेशी पंखांची गरज!
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.


























Subscribe to my channel



