
Mumbai : अजित पवार यांनी नेतृत्व केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनुभवी मंत्री आणि दिग्गज नेते असतानाही महाराष्ट्रातील राजकारणाचा प्रत्यक्ष अनुभव नसलेल्या, प्रशासन हाताळण्याचा वकुब नसलेल्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचेच नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत का आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं कारण बहुसंख्य आमदारांनी पक्षाची दोरी कुटुंबातील व्यक्तीकडेच राहावी, अशी मागणी केली आहे. पार्थ पवार अननुभवी असल्याचे तूर्तास सुनेत्रा वहिनींकडेच पक्षाची आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा जाण्याचे संकेत आहेत.
‘आमचे पंचप्राण आणि राजकीय भविष्य असलेले अजितदादा आज आपल्यात नाहीत, हे अजूनही स्वीकारणे कठीण आहे. या पोरक्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्याची ताकद सुनेत्रा पवारांकडेच आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे, अशी भूमिका नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये सुनेत्रा पवार यांनीच पुढाकार घ्यावा, अशी भूमिका माजी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंसह आमदारांनी मांडली आहे.
|
|
राज्यात सर्वाधिक सात आमदार नाशिक जिल्ह्यातून निवडून आले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर नाशिकचे आमदार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून होते. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी सिन्नर नगरपालिकेच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोकाटेंसह अन्य आमदारांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी नाशिकरोड-देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, कळवणचे आमदार नितीन पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे उपस्थित होते.
कुटुंबातील व्यक्तीनेच पक्षाची धुरा सांभाळावी
कोकाटे म्हणाले, ‘दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांच्यासोबत उभे राहिलो. आज दादा नसले तरी त्यांचे विचार आणि कार्यपद्धती पुढे नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीनेच पक्षाची धुरा सांभाळावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांशी दादांची झालेली चर्चा सुनेत्रा वहिनींना माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेतील वाटा आणि पक्षाचे नेतृत्त्व त्यांच्या हाती असावे,’ असेही ते म्हणाले.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यास राज्यसभेवर कोणाला पाठवायचे, याचा संपूर्ण निर्णयाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडेच असावा आणि आम्ही सर्व आमदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही कोकाटे यांनी दिली. पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित आमदारांना भावना अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
४१ आमदारांचा पाठिंबा
अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची मंत्रिपदे, राष्ट्रीय अध्यक्षपद तसेच गटनेतेपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच सोपवावी, असा ठराव करण्यात येणार असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर पक्षातील सर्व ४१ आमदारांचा विश्वास आहे, या संदर्भात मंत्री नरहरी झिरवाळ, दत्ता भरणे, आमदार दिलीप बनकर, किरण लहामटे, आशुतोष काळे, संग्राम जगताप यांच्यासह बहुतेक आमदारांशी चर्चा झाल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वय पाहता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजितदादा आणि शरद पवार यांच्यात बैठकाही होत होत्या. तर, अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे निर्णय घेतील, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर देशपातळीवर अजित पवार यांच्या जागेवर सुप्रिया सुळे असतील किंवा प्रफुल पटेल असतील. कारण देशात ज्यांनी काम केले आहे, त्यांनाच पुढे केले जाईल, असेदेखील झिरवाळ यांनी सांगितले. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय पवार कुटुंबच घेईल, असे कोकाटे यांनी म्हटले आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel





Turn your audience into earnings—become an affiliate partner today!
Join our affiliate community and maximize your profits!