न्यायालयांमध्ये एआय वापराद्वारे खटल्यांच्या कामकाजाचे ट्रान्सस्क्रिप्ट तयार झाले, तर ‘तारीख पे तारीख’चा चक्रव्यूह कमी होऊ शकतो. मात्र, जनतेच्या हितासाठी एआयचा व्यावहारिक वापर न केला जाणे चिंताजनक आहे. देशात सध्या एआयची लाट आहे. हे संकट ठरेल की विकसित भारताचा शंखनाद, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी ४ मुद्द्यांच्या आधारे न्यायिक व्यवस्थेतील एआयशी संबंधित आव्हाने आणि विरोधाभासांचे मूल्यमापन केले जाऊ शकते:
१. ई-कोर्ट््स प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात एआय आणि ब्लॉकचेनच्या वापरासाठी केवळ ५३.५७ कोटी रुपये दिले गेले. सर्वोच्च न्यायालयात संशोधन आणि अनुवादासाठी अनेक एआय साधने तयार केली गेली आहेत. परंतु ९९ टक्क्यांहून अधिक खटले उच्च व जिल्हा न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. तिथे एआयच्या माध्यमातून पोलिस, न्यायालय, तुरुंग, फिर्यादी आणि पक्षकार यांना जोडून जामिनाशी संबंधित लाखो प्रकरणांमध्ये लवकर निर्णय होऊ शकतो. एआयच्या वापरामुळे चेक बाउन्स आणि ट्रॅफिक चलान यांसारख्या कोट्यवधी खटल्यांचा जलद निपटारा होऊन न्यायालयांवरील खटल्यांचा बोजा कमी होऊ शकतो. न्यायालयांमध्ये एआय साधनांच्या वापराद्वारे खटल्यांच्या कामकाजाचे ट्रान्सस्क्रिप्ट तयार झाले, तर तारखांचा घोळ कमी होऊ शकतो. पण सामान्य जनतेसाठी जलद आणि योग्य न्यायाचा अधिकार सुनिश्चित करण्यात एआयचा व्यावहारिक वापर न होणे चिंताजनक आहे. २. विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी म्हटले की, निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत मदत आणि केस मॅनेजमेंटच्या माध्यमातून एआय न्यायाचा वेग वाढवू शकते, परंतु हे न्यायाधीशांचा विवेक आणि मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाही. न्यूझीलंडमधे ख्राइस्टचर्च जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एआयद्वारे लिहिलेले माफीपत्र नाकारताना म्हटले की, त्यात संवेदना व मानवी भावांचा अभाव आहे.गतवर्षी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती गवई यांनी म्हटले होते की, चॅटजीपीटीच्या वापरामुळे घटनात्मक व्यवस्थेसमोर मोठी संकटे येत आहेत. गेल्या महिन्यात बॉम्बे हायकोर्टानेही एआयद्वारे तयार केलेल्या काल्पनिक खटल्याच्या उल्लेखावर ५० हजारांचा दंड ठोठावला होता. आता मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे. वकिलांच्या ड्राफ्टिंगमध्ये व न्यायाधीशांच्या निर्णयात एआयच्या चुकीच्या वापराने खटले अधिक गुंतागुंतीचे बनवले जात आहेत. ३. लोकसभेत कायदामंत्र्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये सांगितले होते की, न्यायपालिकेत एआयच्या वापरामुळे अल्गोरिदम (पूर्वग्रह), अनुवादाची समस्या आणि डेटा सुरक्षा यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर ई-कमिटी विचार करत आहे. त्यापूर्वी मार्च २०२५ मध्ये मंत्र्यांनी संसदेत सांगितले होते की, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या माध्यमातून निर्णयांचे १८ भाषांमध्ये भाषांतर होत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी म्हटले की, एआयच्या चुकीच्या वापरामुळे न्यायिक प्रशासनात अडथळा येऊ नये. तरीही सोनम वांगचुक यांची अटक वैध ठरवण्यासाठी पुरावा म्हणून सरकारने तीन मिनिटांच्या भाषणाचा आठ मिनिटांचा अनुवाद सादर केला. न्या.ती अरविंद कुमार व वराळे यांच्या खंडपीठाने म्हटले की, एआयच्या युगात अनुवादाच्या प्रकरणांमध्ये किमान ९८ टक्के अचूकता आवश्यक आहे. न्यायाधीशांच्या मते, सरकार अशा गोष्टीवर विश्वास ठेवत आहे जी वास्तव नाही. ४. सुनावणी आणि प्रसारणात व्हॉट्सॲप आणि झूम सारख्या ॲप्सचा वापर होणे बेकायदेशीर असण्यासोबतच न्यायिक व्यवस्थेत विदेशी हस्तक्षेपदेखील आहे. गृह मंत्रालयाच्या नवीन आदेशानुसार, वर्गीकृत माहिती प्रसारमाध्यमांशी शेअर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गोपनीयता कायद्यांतर्गत कडक फौजदारी कारवाई केली जाईल, परंतु डिजिटल आणि एआय कंपन्यांसोबत जनता आणि सरकारचा डेटा बेकायदेशीर आणि संघटित पद्धतीने शेअर करण्याविरुद्ध कारवाई होत नाही. गोपनीयतेच्या अधिकारावरील सर्वोच्च न्यायालयाचा नऊ वर्षे जुना निर्णय लागू करण्याऐवजी, थंड बस्त्यात पडलेल्या डेटा सुरक्षा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयांत सुनावणी होणे हे एक वेगळेच प्रहसन आहे. एआयच्या माध्यमातून ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ हे लक्ष्य साध्य झाले तर उत्तम, परंतु एआय क्रांतीच्या नावाखाली परदेशी कंपन्यांचे वर्चस्व निर्माण झाले, तर संविधानाचे सार्वभौमत्व आणि आत्मनिर्भर भारतासमोर संकटाची त्सुनामी येऊ शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) viraggupta@hotmail.com
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


