पुणे: 'जुना मीटर स्लो आहे, स्मार्ट मीटर बसवा' महावितरणाच्या दाव्याने ग्राहकांमध्ये संभ्रम

पुणे: राज्यात स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या मोहिमेदरम्यान महावितरणाच्या एका दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अनेक ग्राहकांना त्यांच्या जुन्या वीज मीटरचा वेग कमी असल्याचे सांगून स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह केला जात असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून या दाव्याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या जुन्या मीटरमुळे प्रत्यक्ष वापरापेक्षा कमी वीज नोंदवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अचूक वीज वापराची नोंद होण्यासाठी स्मार्ट मीटर बसविणे आवश्यक असल्याचे महावितरणकडून सांगितले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, ग्राहक संघटना आणि काही नागरिकांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जुने मीटर खरोखरच 'स्लो' आहेत का, त्यासाठी कोणते तांत्रिक निकष वापरले जातात आणि स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात नेमका काय फरक पडणार, याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी होत आहे.

महावितरणने मात्र स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक नोंद, रिअल-टाइम मॉनिटरिंग, बिलिंगमधील पारदर्शकता आणि तांत्रिक अडचणींवर जलद नियंत्रण शक्य होणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहिमाही राबविण्यात येत आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *