
Satara : सातारा लोकसभेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीचा निकाल मंगळवारी (ता. चार) लागणार आहे. त्याला आता एकच दिवस उरल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य यात पणाला लागले आहे. निकालाला अवघे काही तास राहिल्याने कार्यकर्त्याची धाकधूक वाढली आहे. येणार तर आम्हीच, या विश्वासातून दोन्हीं बाजूच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
नुकत्याच आलेल्या विविध एक्झिट पोलच्या अंदाजानंतरही दावे-प्रतिदावे सुरू असून, कार्यकर्त्याबरोबरच नागरिकांमध्येही पैजांचा जोर वाढू लागला आहे. सातारा लीकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेस विचारसरणीसोबत राहिला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या जिल्ह्यातील मतदार शरद पवारांसोबत भक्कमपणे उभा राहिला. मागील लोकसभा पोटनिवडणुकीतही ते दिसून आले. यावेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे हक्काचा गड राखण्याचे आव्हान शरद पवार याच्यासमोर होते, त्यातच श्रीनिवास पाटील यांनी आजारपणामुळे माघार घेतली.
|
|
दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांचे तिकीट भाजपकडून अंतिम होत नव्हते. त्यामुळे उमेदवार निवडीपासून या मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. अखेरीस उदयनराजे व आमदार शशिकांत शिंदे यांची नावे अंतिम झाली. त्यानंतर लढतीला खऱ्या अर्थाने धार आली. तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक हायव्होल्टेज झाली.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या नेत्याच्या विजयासाठी रात्रंदिवस झटत होते. त्यामुळे आपल्याच नेत्याचा विजय होणार, असा दोन्ही बाजूच्या कार्यकर्ताना विश्वास आहे. त्यातूनच गुलाल आमचाच अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. काहींनी बेतरही लावलेल. पेजच्या माध्यमातून दावा पक्का अगल्याचे दाखविले जात आहे.
साताऱ्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली आहे. काहींनी ध्वनिक्षेपकही बुक करून ठेवले आहेत. मिरवणुकीसाठी गाडी सजविण्याची काहींची तयारी सुरू आहे. मिरवणूक कशी व कोठून काढायची, याचे प्लॅन केले जात आहेत. गुलालाचेही अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. दोन्ही बाजूंनी ही तयारी लपूनछपून होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर विविध वाहिन्या व समाजमाध्यमावरून संपूर्ण देशाच्या निकालाचा अवाज मांडण्यात आला. या निकालानंतर साताऱ्यातही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या चर्चाना जीर चढला आहे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एक्झिट पोलच्या अंदाजांचे आपल्या पद्धतीने विश्लेषण करत आहेत. निकाल बाजूने असल तर समर्थनार्थ आणि विरोधी असेल तर तो कसा खोटा आहे. हे सांगण्यासाठीची माडणी केली जात आहे
मतमोजणीदरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागानेही मंगळवारी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत मद्य विक्री बंद राहणार असल्याचे सांगितले.
उदयनराजे भोसले यांना २०१९ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर शशिकांत शिंदे यांना विधानसभेला मात मिळाली होती. त्यानंतर दोघांचाही राजकीय संघर्ष सुरू होता. ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, दोघांचेही राजकीय अस्तित्व या निवडणुकीमध्ये पणाला लागले होते. दोघे लढलेही त्याच त्वेषाने, त्यामुळे निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाल्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक ताढली आहे. संपूर्ण जिल्यातील नागरिकाचे लक्ष मंगळवारकडे लागले आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान



























Subscribe to my channel




