
Sanjay Raut : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण शिवरायांची एकदा नाही १०० वेळा माफी मागायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊतांनी घणाघाती टीका केली. “माफी मागून असे विषय सुटतात का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं? या घटनेत आरोपी आपटे असले तरी मुख्य आरोपी त्यांना काम देणारे आहेत आणि ते ठाण्यातील आहेत”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत काय म्हणाले?
“खरं म्हणजे दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील या ठिकाणी आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेला पुतळा आम्हाला दुर्देवाने पाहायला मिळतोय. लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाज मनावर झालेला आहे. महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे. आता राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. इतकं होऊन देखील हे राज्य सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. कारण यामध्ये आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत. आपआपल्या माणसांना आणि ठेकेदांना काम देऊन सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. तेथील आसपासच्या घरांची कौलं पडली नाहीत. मग पुतळा कसा पडला?”, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.
|
|
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आणि काही अधिकारी इतके खोटे बोलत आहेत की त्यांना जनाची आणि मनाची उरलेली नाही. ते सांगता आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. मग वाऱ्यामुळे तुमचे कॅमेरे उडाले नाहीत. तेथील बाकीचे सेड्स पडले नाहीत. त्या दिवशी वाऱ्यामुळे झाडं पडली नाहीत. मात्र, पुतळा पडला. मग किती खोटं बोलणार? हे सरकार भारतीय नौदलावर जबाबदारी ढकलत आहेत. भारतीय नौदलाने हिमालयावरही काही स्मारकं उभे केलेले आहेत. मग तेथे तर बर्फ वितळत असतो. तेथे देखील भारतीय नौदलाने काही पुतळे उभे केलेले आहेत. मात्र, या घटनेची जबाबदारी तुम्ही भारतीय नौदलावर ढकलता. तुम्ही तुमच्या पापाचं खापर भारतीय नौदलावर फोडता”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
“राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे शिल्पकार कोणीतरी आपटे म्हणून आहेत. त्यांना अनुभवच नव्हता. ते आधी फक्त लहान-लहान मुर्ती बनवायचे. मात्र, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं? या घटनेत आरोपी हे आपटे असले तरी मुख्य आरोपी हे त्यांना काम देणारे आहेत आणि ते ठाण्यातील आहेत. आपटेंना सुपारी कोणी दिली? आपटेंना एवढा अनुभव नसतानाही त्यांना पुतळ्याचे काम कोणी दिले नसते”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
माफी मागून असे विषय सुटतात का?
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण शिवरायांची एकदा नाही १०० वेळा माफी मागायला तयार आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “माफी मागून असे विषय सुटतात का? मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत माफी मागून जर विषय सुटले असते तर मग ४० गद्दारांना माफी द्यायची का? आता हे प्रकरण राज्य सरकारच्या गळ्याशी आलेलं आहे. सरकारला तोंड दाखवायला जागा नाही. मुख्यमंत्री म्हणाले की मी १०० वेळा माफी मागायला तयार, पण तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारली पाहिजे ना?”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




