राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याच्या अपघाती निधनाला जवळपास 20-22 दिवस उलटून गेले आहेत. 28 जानेवारीला ते मुंबईहून बारामतीला विमानाने जात होते, बारामती एअरपोर्टजवळ आल्यावर त्याचं विमान लँडिंग करताना क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवारांसह आणखी चौघांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात असून हा अपघात नव्हे तर घातपात आहे असा आरोप अनेक लोक करत आहेत. अजित पवार यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar ) यांनीही हा संशय बोलून दाखवला असून त्यांनी गेल्या आठवड्यात मुबईत व दिल्लीत तसेच आज पुन्हा मुंबईत पत्रकार परिषद घेत नेक मुद्दे सविस्तर मांडले. विमानातील अतिरिकेत इंधन, ब्लॅकबॉक्स डॅमेज होणे, अशा अनेक गोष्टींवर बोट ठेवतनाच रोहित पवार यांनी या अपघाताच्या चौकशीला होणार विलंब, त्यातील त्रुटीही दाखवून दिल्या.
तसेच अपघातग्रस्त विमान ज्या व्हीएस आर कंपनीचं आहे, त्याब्द्दल कंपनीच्या मालकाबद्दलही त्यांन काही दावे केले. तसेच सत्तेतल्या काी लोकांकडून कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोपही त्यांनी लावला. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत त्यांच्या विधानामुळे मोठी खळबळ माजली. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही असा सवलाही त्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले रोहित पवार ?
सत्तेचा वापर करून चौकशी करा ना, द्या ना प्राथमिक रिपोर्ट. आम्ही सत्तेत नसताना पुरावे देतोय. चौकशी का करत नाही याचं कारण रिपोर्ट तयार केला जातोय. व्हिएसआर कंपनीला वाचवलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही ? असा सवालही त्यांनी विचारला.
या कंपनीचे मालक व्हिके सिंग आहेत, त्यांचा मुलगा रोहित सिंग याचं दीड- दोन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये लग्न झालं. तिथे कोण कोण गेलं होतं ? सत्तेतील काही लोकं, महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्रप्रदेशच्या टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते हे तिकडे गेले होते. व्हिएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाता, आज जेव्हा व्हीएसआरवर (अपघातप्रकरणी) कारवाई करायची असते तेव्हा टीडीपीचे नेते म्हणतात की, चूक नाही. घात किंवा अपघात झाल्यापासून आतापर्यंत राज्याचे मंत्री व्हिएसआरने प्रवास करत आहेत. इतर राज्यांचे मंत्रीही प्रवास करत आहेत. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. हैद्राबादचा बडा नेताही व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत असा दावा रोहित पवार यांनी केला.
कंपनीच्या मालकाला भारताबाहेर जायला कोणी मदत केली ?
अजित दादांच्या जाण्याने आम्ही दु:खात आहोत, अख्खा महाराष्ट्र दु:खात आहे. पण व्हीएसआर कंपनीचा मालक भारतात नाही. त्याला कुणी भारताबाहेर जायला मदत केली ? असा सवाल रोहिति पवार यांनी विचारला. कंपनीच्या मालकाला अटक करून चौकशी करायला हवी होती. पण ते भारताबाहेर आहेत. अमेरिकेत मायामीला गेले आहेत. व्हिएसआर कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक मुद्दाम मालकाला वाचवत आहेत,असा आरोप रोहित यांनी केला. अजित दादा गेले त्याचं काही नाही, पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून या कंपनीला मदत केली जात आहे असंही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करा
या कंपनीवर आज ना उद्या बंदी घातली पाहिजे. याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत टीडीपीच्या (त्या) मंत्र्याला वेगळी जबाबदारी द्यावी, या पदावरून त्यांना दूर करा, त्यांना या पदावरून काढण्यात यावं. यात त्यांचं लिंकिंग असल्याने तपास नीट होत नाही. मंत्र्याचा या घातपातात हात आहे, असं म्हणत नाही. पण व्हिएसआरला तुम्ही वाचवत आहात, असं चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे. या मंत्र्यांच्या पार्टीचे लोक सिंगच्या लग्नाला गेले होते. व्हीएसआरची काही चूक नसल्याचे हे मंत्री म्हणत आहेत. त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्या मंत्र्याला बाजूला करावं अशी मागणीही रोहित पवार यांनी करत टीडीपीच्या मंत्र्यावर निशाणा साधला.
रोहित पवारांनी काय केली विनंती ?
या अपघातात अजित पवारांसह आणखी चौघ मृत्यू पावले. त्यांच्यापैकी काहींच्या कुटुंबियाची रोहित पवारांनी भेट घेतली. त्याबद्दलही ते बोलले, विमानाची को – पायलट शांभवी पाठक या अपघातात गेली. तिच्या कुटुंबाला मी भेटलो. त्यांची एक मागणी आहे. सत्तेतील लोकच पूर्ण करू शकतील. सत्तेतील लोकांनी त्यांना भेटलं पाहिजे. केंद्र सरकारकडून ही मागणी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ती विनंती करतो असं रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांचे अंगरक्षक विदिप जाधव यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली. जाधव यांच्या पत्नी ठाणे महापालिकेत कामाला आहेत. त्या परमंट नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भेटणार आहोत. पण त्यांना परमनंट करता आलं तर बरं होईल अशी मी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत भाऊ शिंदे यांना विनंती करतो , असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.
शहर
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
महाराष्ट्र
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
गुन्हा
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
























Subscribe to my channel

