राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याच्या अपघाती निधनाला जवळपास 20-22 दिवस उलटून गेले आहेत. 28 जानेवारीला ते मुंबईहून बारामतीला विमानाने जात होते, बारामती एअरपोर्टजवळ आल्यावर त्याचं विमान लँडिंग करताना क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवारांसह आणखी चौघांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात असून हा अपघात नव्हे तर घातपात आहे असा आरोप अनेक लोक करत आहेत. अजित पवार यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar ) यांनीही हा संशय बोलून दाखवला असून त्यांनी गेल्या आठवड्यात मुबईत व दिल्लीत तसेच आज पुन्हा मुंबईत पत्रकार परिषद घेत नेक मुद्दे सविस्तर मांडले. विमानातील अतिरिकेत इंधन, ब्लॅकबॉक्स डॅमेज होणे, अशा अनेक गोष्टींवर बोट ठेवतनाच रोहित पवार यांनी या अपघाताच्या चौकशीला होणार विलंब, त्यातील त्रुटीही दाखवून दिल्या.
तसेच अपघातग्रस्त विमान ज्या व्हीएस आर कंपनीचं आहे, त्याब्द्दल कंपनीच्या मालकाबद्दलही त्यांन काही दावे केले. तसेच सत्तेतल्या काी लोकांकडून कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोपही त्यांनी लावला. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत त्यांच्या विधानामुळे मोठी खळबळ माजली. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही असा सवलाही त्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले रोहित पवार ?
सत्तेचा वापर करून चौकशी करा ना, द्या ना प्राथमिक रिपोर्ट. आम्ही सत्तेत नसताना पुरावे देतोय. चौकशी का करत नाही याचं कारण रिपोर्ट तयार केला जातोय. व्हिएसआर कंपनीला वाचवलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही ? असा सवालही त्यांनी विचारला.
या कंपनीचे मालक व्हिके सिंग आहेत, त्यांचा मुलगा रोहित सिंग याचं दीड- दोन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये लग्न झालं. तिथे कोण कोण गेलं होतं ? सत्तेतील काही लोकं, महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्रप्रदेशच्या टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते हे तिकडे गेले होते. व्हिएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाता, आज जेव्हा व्हीएसआरवर (अपघातप्रकरणी) कारवाई करायची असते तेव्हा टीडीपीचे नेते म्हणतात की, चूक नाही. घात किंवा अपघात झाल्यापासून आतापर्यंत राज्याचे मंत्री व्हिएसआरने प्रवास करत आहेत. इतर राज्यांचे मंत्रीही प्रवास करत आहेत. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. हैद्राबादचा बडा नेताही व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत असा दावा रोहित पवार यांनी केला.
कंपनीच्या मालकाला भारताबाहेर जायला कोणी मदत केली ?
अजित दादांच्या जाण्याने आम्ही दु:खात आहोत, अख्खा महाराष्ट्र दु:खात आहे. पण व्हीएसआर कंपनीचा मालक भारतात नाही. त्याला कुणी भारताबाहेर जायला मदत केली ? असा सवाल रोहिति पवार यांनी विचारला. कंपनीच्या मालकाला अटक करून चौकशी करायला हवी होती. पण ते भारताबाहेर आहेत. अमेरिकेत मायामीला गेले आहेत. व्हिएसआर कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक मुद्दाम मालकाला वाचवत आहेत,असा आरोप रोहित यांनी केला. अजित दादा गेले त्याचं काही नाही, पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून या कंपनीला मदत केली जात आहे असंही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करा
या कंपनीवर आज ना उद्या बंदी घातली पाहिजे. याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत टीडीपीच्या (त्या) मंत्र्याला वेगळी जबाबदारी द्यावी, या पदावरून त्यांना दूर करा, त्यांना या पदावरून काढण्यात यावं. यात त्यांचं लिंकिंग असल्याने तपास नीट होत नाही. मंत्र्याचा या घातपातात हात आहे, असं म्हणत नाही. पण व्हिएसआरला तुम्ही वाचवत आहात, असं चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे. या मंत्र्यांच्या पार्टीचे लोक सिंगच्या लग्नाला गेले होते. व्हीएसआरची काही चूक नसल्याचे हे मंत्री म्हणत आहेत. त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्या मंत्र्याला बाजूला करावं अशी मागणीही रोहित पवार यांनी करत टीडीपीच्या मंत्र्यावर निशाणा साधला.
रोहित पवारांनी काय केली विनंती ?
या अपघातात अजित पवारांसह आणखी चौघ मृत्यू पावले. त्यांच्यापैकी काहींच्या कुटुंबियाची रोहित पवारांनी भेट घेतली. त्याबद्दलही ते बोलले, विमानाची को – पायलट शांभवी पाठक या अपघातात गेली. तिच्या कुटुंबाला मी भेटलो. त्यांची एक मागणी आहे. सत्तेतील लोकच पूर्ण करू शकतील. सत्तेतील लोकांनी त्यांना भेटलं पाहिजे. केंद्र सरकारकडून ही मागणी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ती विनंती करतो असं रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांचे अंगरक्षक विदिप जाधव यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली. जाधव यांच्या पत्नी ठाणे महापालिकेत कामाला आहेत. त्या परमंट नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भेटणार आहोत. पण त्यांना परमनंट करता आलं तर बरं होईल अशी मी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत भाऊ शिंदे यांना विनंती करतो , असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


