
Pune : भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धात मोलाची भूमिका बजावणारे आणि १९७१च्या युद्धानंतर पाकिस्तानात युद्धकैदी म्हणून पकडले गेल्यानंतर तिथून तुरुंगातून पळून जाण्याचा धाडसी बेत आखून तो तडीस नेण्याचा प्रयत्न करणारे ग्रुप कॅप्टन (नि.) दिलीप कमलाकर परुळकर (८२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. १९७१ च्या युद्धावेळी रावळपिंडी येथील पाकिस्तानी सैन्याच्या युद्धकैद्यांच्या छावणीतून दोन सहकाऱ्यांसह त्यांनी केलेल्या यशस्वी पलायनाची घटना खूप गाजली होती.
परुळकर मार्च १९६३ मध्ये भारताच्या हवाई दलात रुजू झाले. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केले. डुंडीगल येथील एअर फोर्स अकादमीमध्ये ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर होते. तसेच, दोन वर्षे सिंगापूर येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) बटालियन कमांडर म्हणूनही योगदान दिले. १९६५ मध्ये भारत पाकिस्तान युद्धावेळी शत्रूच्या गोळीबाराने त्यांच्या विमानाला इजा झाली, तसेच त्यांच्या खांद्याला गोळी लागून ते जखमी झाले होते. मात्र, त्यानंतरही विमान उडवून ते यशस्वीरीत्या तळावर परतले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना वायुसेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
|
Shocking News : शेतजमिनीसाठी बनला हैवान; आईच्या हत्येनंतर मुलानं स्वत:लाही संपवलं |
भारताच्या हवाई दलाने परुळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘१९७१ च्या युद्धावेळी विंग कमांडर डी. के. परुळकर यांनी प्रचंड शौर्य दाखवले. पाकिस्तानात युद्धकैदी असताना त्यांनी दोन सहकाऱ्यांसह सैन्याच्या छावणीतून पलायन केले. त्यांनी दाखवलेला निर्धार, शौर्य हे हवाई दलाच्या सर्वोत्तम परंपरेतील होते. त्यांच्या त्या कृतीमुळे शत्रूला हवाई दलाचे सामर्थ्य केवळ आकाशातच नाही, तर जमिनीवरही असल्याचे मान्य करून कौतुक करावे लागले होते,’ असे हवाई दलाने समाज माध्यमावरील पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पाकिस्तानात युद्धकैदी असताना तेव्हा फ्लाइट लेफ्टनंट रँक असलेल्या परुळकर यांनी पाकिस्तानच्या ताब्यातून सुटून भारतात पळून येण्याचा धाडसी बेत आखला. त्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचे बारीक नियोजन केले. फ्ला. ले. ग्रेवाल आणि फ्ला. ले. हरिश सिंहजी या इतर दोन सहकाऱ्यांसह ते तुरुंगातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. कुठलाही संशय येऊ नये, म्हणून त्यांनी ताबारेषेकडे (एलओसी) येण्याऐवजी ते अफगाणिस्तानच्या सीमेकडे जाण्याचा निर्णय घेतला. तुरुंगातून सुटल्यावर पेशावर, लंडी कॅनालपर्यंत ते गेले. अफगाणिस्तानच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असतानाच तेथील गावकऱ्यांना त्यांच्या हालचाली पाहून संशय आला आणि त्यांना पुन्हा ताब्यात घेतले गेले. नंतर १९७२ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटून पळून जाण्याची कथा साऱ्या जगभर गाजली. त्यांच्या या धाडसाची अंगावर रोमांच उभे करणारी कथा फेथ जॉन्स्टन यांनी ‘फोर माइल्स टू फ्रीडम’ या पुस्तकात लिहिली आहे.‘द ग्रेट इंडियन एस्केप – खुले आसमान की ओर’ नावाचा चित्रपटही त्यावर निघाला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



