
Pune Nashik Railway : पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये रेल्वे प्रवास लवकरच सोपा आणि जलद होणार आहे. केंद्र सरकारने या मार्गासाठी भव्य मास्टर प्लानला मंजुरी दिली आहे. नवीन हाय-स्पीड आणि सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पामुळे अंतर केवळ २ ते अडीच तासांत पार होईल. सध्या रोडने ५-६ तास लागणारा प्रवास आता आरामदायी आणि वेळेची बचत करणारा होईल. पुणे-नाशिक महामार्गावरील प्रचंड वाहतूककोंडीतून सुटका मिळेल. प्रवासी, व्यावसायिकांना आणि पर्यटकांना या मार्गाचा मोठा फायदा मिळणार आहे. हा रेल्वे प्रकल्प केवळ वेळ वाचवणार नाही, तर दोन्ही शहरांमधील आर्थिक व सामाजिक जोडणी अधिक बळकट करेल. अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत माहिती दिली. जाणून घेऊयात हा प्रोजेक्ट नेमका आहे तरी काय?
लोकसभेत नाशिक–पुणे हाय-स्पीड प्रकल्पासंदर्भात करण्यात आलेल्या सूचनांवर वैष्णव यांनी उत्तर दिले. महाराष्ट्र सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञ यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर रेल्वे विभागाने जीएमआरटी क्षेत्र टाळणारी पर्यायी मार्गरचना प्रस्तावित केली आहे. या मार्गामुळे या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक केंद्राचे संरक्षण सुनिश्चित झाले. त्याशिवाय या भागातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकासालाही चालना मिळते.
|
Pune : वाढत्या थंडीचा फटका; शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा |
कसा असेल नवीन रेल्वे मार्ग -
नाशिक → साईनगर शिर्डी → पुणतांबा → निंबलक → अहिल्यानगर → पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे)
नाशिक-पुणे मार्गाचे काम किती झाले?
नाशिक रोड ते साईनगर शिर्डी दरम्यानच्या दुहेरी मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ची तयारी पूर्ण झाली आहे.
साईनगर शिर्डी–पुणतांबा (१७ किमी) दुहेरीकरणासाठी रु २४० कोटींची मंजुरी आधीच देण्यात आली आहे.
पुणतांबा–निंबलक (८० किमी) या मार्गाचे दुहेरीकरणाचे आधीच पूर्ण झाले आहे.
निंबलक –अहिल्यानगर (६ किमी) या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
अहिल्यानगर–पुणे (१३३ किमी) दरम्यान चाकण इंडस्ट्रियल इस्टेटला जोडणाऱ्या नवीन दुहेरी मार्गासाठी रु८,९७० कोटींचा डीपीआर देखील तयार करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग झाल्यास फायदा काय?
तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. नवीन मार्गरचना नाशिक, एक वारसा आणि धार्मिक शहर, देशातील सर्वात प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या साईनगर शिर्डीशी आणि पेशवे राजवटीत मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शहर पुणेशी जोडला जाईल. शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूर मार्गावरील धार्मिक पर्यटन जोडली जातील. पुण्यातील किल्ले व ऐतिहासिक वारसा स्थळांशी निगडित ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. मार्गिकेजवळील ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक हस्तकला उद्योगांना चालना मिळेल. पर्यटक, भक्त आणि प्रवासी यांना या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांदरम्यान अधिक सुरळीत, जलद आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येईल. त्याशिवाय चाकणमध्ये असणाऱ्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. पुणे-नाशिक या कॉरिडॉरमुळे या पट्ट्यात येणाऱ्या विविध उद्योगांना, विशेषतः चाकण औद्योगिक वसाहत, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी उद्योगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादन केंद्राला लक्षणीय फायदा होईल.
कनेक्टिव्हिटीमुळे काय होणार ?
विद्यार्थ्यांच्या गतिशीलतेत वाढ होईल.
शैक्षणिक आणि कौशल्य-विकास सहकार्य अधिक बळकट होईल
ज्ञानाधारित आणि तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांच्या वाढीस चालना मिळेल
संपूर्ण कॉरिडॉरमध्ये संतुलित शहरी विकासाला चालना मिळेल
पुणे–नाशिक मार्ग ही महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दोन प्रमुख महानगर क्षेत्रांना जोडून, चाकण तसेच इतर औद्योगिक पट्ट्यांनाही याचा फायदा होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे पर्यटन व शैक्षणिक गतिशीलता अधिक बळकट होईल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



