
Pune : ‘पर्यावरणाचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता निर्माण व्हायला हवी. पर्यावरण संवर्धनासाठी योग्य पावले न उचलल्यास मनुष्यजातीचा अंत समीप आहे,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी बुधवारी व्यक्त केले.
किर्लोस्कर वसुंधरा फाउंडेशनतर्फे आयोजित ‘किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, किर्लोस्कर समूहाचे मनुष्यबळ विकास अधिकारी असीम श्रीवास्तव, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष आर. आर. देशपांडे, संयोजक वीरेंद्र चित्राव यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक डॉ. सुरेश मिजार, अर्किटेक्ट यतीन मोघे आणि अर्किटेक्ट सरिता झांबरे, सुवर्णा भांबूरकर, अर्जुन नाटेकर, तुषार सरोदे आदी या वेळी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड डी. एस. कदम सायन्स कॉलेजने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक राजकोट येथील आत्मीय युनिव्हर्सिटीने, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नाशिक येथील पी. व्ही. जी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड एस. एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने पटकावले.
|
Pune : स्वारगेटसह उपमुख्यमंत्र्यांच्या बारामती बस स्थानकात सुरक्षेचा अभाव |
कर्नाटकातील होसपेट येथील श्री गवीसिद्धेशवरा डिग्री कॉलेज, पिंपरी – चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथील डी. डी. टी. एस. मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, अहमदाबाद येथील सिल्व्हर ओक युनिव्हर्सिटी आणि खडकी येथील टिकाराम जगन्नाथ कॉलेज यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
डॉ. आगाशे म्हणाले, ‘पर्यावरणासंदर्भात विद्यार्थीदशेमध्ये संवेदनशीलता वाढवता आल्यास ते विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक होतील. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाटक, लघुपट ही माध्यमे यासाठी अत्यंत प्रभावी माध्यमे ठरू शकतात.’
‘सगळ्या जगात पर्यावरणाचे असंतुलन ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, पर्यावरण संवर्धनासाठी तरुण मुले अधिक प्रयत्नशील दिसतात. त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य आहे. हे आशादायी चित्र असले, तरीही पर्यावरण वाचायचे असेल, तर युवकांनी पर्यावरणीय दूत होण्याचा निर्धार केला पाहिजे,’ अशी अपेक्षा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. त्रिवेणी माथूर यांनी सूत्रसंचालन केले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




