
Pune : राजकीय पक्षांच्या राजकारणाचा मतदारांनाच उबग आला की, नेत्यांचे एक वाक्य ठरलेले असते, ‘आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो.’ म्हणजे सर्व काही समाजासाठी करत असल्याचे ते दाखवून देतात. मतदारांना रुचणार नाही, असा निर्णय घेतला की, ‘राजकारण आणि प्रेमात सर्व काही माफ असते’ असले वाक्य फेकले की, मतदार काही बोलत नाहीत. सद्या:स्थितीतील राजकीय पक्षांच्या या सोयीच्या राजकारणात आदर्श समाजसेवक, राजकारणी कसे असतात, याचा वास्तुपाठ पुण्यात पूर्वसुरींनी घालून दिला आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करताना राजकीय पक्षांनी आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या पूर्वसुरींनी दाखवून दिलेल्या मार्गांची आठवण ठेवली, तरी पुरेशी आहे.
पुण्याच्या राजकारणाला एक गौरवशाली परंपरा आहे. त्याचे स्मरण राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकारणात नैतिकतेची घसरण सुरू असताना पुण्याचे नेतृत्व किती महान व्यक्तींनी केले आहे, याची आठवण राजकारण्यांनी ठेवण्याची आता वेळ आली आहे. त्या पूर्वसुरींचे स्मरण ठेवले, तर राजकारणात चुकीचा पायंडा पाडणाऱ्यांचे पाऊल चुकीचे पडणार नाही.
तत्कालीन पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले यांनी काम केले आहे. साहित्यसम्राट न. चिं. केळकर, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे, नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे सभासद होते. १९२० पूर्वी या महान व्यक्तींनी पुणे नगरपालिकेत नेतृत्व केले आहे. १९२० नंतर काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे यांसारख्या थोर नेत्यांनी पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून काम पाहिले आहे.
|
|
लोकमान्य टिळक हे १८९५ साली पुणे नगरपालिकेमध्ये पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. गोपाळ कृष्ण गोखले हे १९०४ आणि १९०५ मध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष होते. हरिभाऊ आपटे हे १९१८ मध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष होते. पुण्याच्या राजकारणावर महात्मा फुले यांची सामाजिक चळवळ, लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय जहाल राजकारण आणि १९२० नंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाचा प्रभाव होता. काकासाहेब गाडगीळ हे १९२८ ते १९३२ या काळात पुणे नगरपालिकेचे सभासद होते. १९३८ मध्ये काँग्रेस पक्षाने पुणे नगरपालिकेची निवडणूक लढविली, तेव्हा आचार्य अत्रे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे नगरपालिकेची निवडणूक लढविली होती. ते तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्षही होते.
गोपाळ कृष्ण गोखले हे नगरपालिकेचे अध्यक्ष असताना १९०५ मध्ये त्यांना एक महिन्यासाठी इंग्लंडला जायचे होते. या काळात त्यांना अध्यक्षपदाचे काम पाहता येणार नव्हते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हे उदाहरण सध्याच्या राजकारण्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहे. राजकारणात नैतिक मूल्यांची जपणूक कशी करण्यात येत होती, याचा हा दाखला म्हणावा लागेल.
स्वातंत्र्यपूर्व काळातील पुण्याच्या राजकारणातील या महान व्यक्तींनी पुण्याच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले. राजकारणात नैतिकता असते. नैतिकतेची पातळी सोडून राजकारण करायचे नसते, याचा त्यांनी वस्तुपाठ घालून दिला होता. सद्याच्या परिस्थितीत राजकीय पक्ष, नेते आणि उमेदवार यांनी राजकारणाचा खेळखंडोबा केला असताना या महान समाजसेवक, राजकारणींचे स्मरण ठेवले, तर निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असल्याचे मतदारांना वाटेल आणि राजकारणाची पातळी घसरणार नाही.
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य
























Subscribe to my channel




