
Pune : राजकीय पक्षांच्या राजकारणाचा मतदारांनाच उबग आला की, नेत्यांचे एक वाक्य ठरलेले असते, ‘आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो.’ म्हणजे सर्व काही समाजासाठी करत असल्याचे ते दाखवून देतात. मतदारांना रुचणार नाही, असा निर्णय घेतला की, ‘राजकारण आणि प्रेमात सर्व काही माफ असते’ असले वाक्य फेकले की, मतदार काही बोलत नाहीत. सद्या:स्थितीतील राजकीय पक्षांच्या या सोयीच्या राजकारणात आदर्श समाजसेवक, राजकारणी कसे असतात, याचा वास्तुपाठ पुण्यात पूर्वसुरींनी घालून दिला आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करताना राजकीय पक्षांनी आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या पूर्वसुरींनी दाखवून दिलेल्या मार्गांची आठवण ठेवली, तरी पुरेशी आहे.
पुण्याच्या राजकारणाला एक गौरवशाली परंपरा आहे. त्याचे स्मरण राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकारणात नैतिकतेची घसरण सुरू असताना पुण्याचे नेतृत्व किती महान व्यक्तींनी केले आहे, याची आठवण राजकारण्यांनी ठेवण्याची आता वेळ आली आहे. त्या पूर्वसुरींचे स्मरण ठेवले, तर राजकारणात चुकीचा पायंडा पाडणाऱ्यांचे पाऊल चुकीचे पडणार नाही.
तत्कालीन पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले यांनी काम केले आहे. साहित्यसम्राट न. चिं. केळकर, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे, नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे सभासद होते. १९२० पूर्वी या महान व्यक्तींनी पुणे नगरपालिकेत नेतृत्व केले आहे. १९२० नंतर काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे यांसारख्या थोर नेत्यांनी पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून काम पाहिले आहे.
|
|
लोकमान्य टिळक हे १८९५ साली पुणे नगरपालिकेमध्ये पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. गोपाळ कृष्ण गोखले हे १९०४ आणि १९०५ मध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष होते. हरिभाऊ आपटे हे १९१८ मध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष होते. पुण्याच्या राजकारणावर महात्मा फुले यांची सामाजिक चळवळ, लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय जहाल राजकारण आणि १९२० नंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाचा प्रभाव होता. काकासाहेब गाडगीळ हे १९२८ ते १९३२ या काळात पुणे नगरपालिकेचे सभासद होते. १९३८ मध्ये काँग्रेस पक्षाने पुणे नगरपालिकेची निवडणूक लढविली, तेव्हा आचार्य अत्रे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे नगरपालिकेची निवडणूक लढविली होती. ते तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्षही होते.
गोपाळ कृष्ण गोखले हे नगरपालिकेचे अध्यक्ष असताना १९०५ मध्ये त्यांना एक महिन्यासाठी इंग्लंडला जायचे होते. या काळात त्यांना अध्यक्षपदाचे काम पाहता येणार नव्हते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हे उदाहरण सध्याच्या राजकारण्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहे. राजकारणात नैतिक मूल्यांची जपणूक कशी करण्यात येत होती, याचा हा दाखला म्हणावा लागेल.
स्वातंत्र्यपूर्व काळातील पुण्याच्या राजकारणातील या महान व्यक्तींनी पुण्याच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले. राजकारणात नैतिकता असते. नैतिकतेची पातळी सोडून राजकारण करायचे नसते, याचा त्यांनी वस्तुपाठ घालून दिला होता. सद्याच्या परिस्थितीत राजकीय पक्ष, नेते आणि उमेदवार यांनी राजकारणाचा खेळखंडोबा केला असताना या महान समाजसेवक, राजकारणींचे स्मरण ठेवले, तर निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असल्याचे मतदारांना वाटेल आणि राजकारणाची पातळी घसरणार नाही.
शहर
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- मुंबई: वीज ग्राहकांना मोठा दिलासा, 'स्मार्ट मीटर' सक्तीचे नाही, महावितरणचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण!
- गिरगावकर तहानलेले! मुंबईच्या गिरगाव परिसरात गेल्या महिन्याभरापासून भीषण पाणीटंचाई, नागरिक हैराण.
- मृत्यूवर मात! अडीच वर्षांच्या चिमुकलीला नागाचा दंश; हृदय बंद पडले असताना डॉक्टरांनी परत आणले मृत्यूच्या दाढेतून!
महाराष्ट्र
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- मुंबई: वीज ग्राहकांना मोठा दिलासा, 'स्मार्ट मीटर' सक्तीचे नाही, महावितरणचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण!
- गिरगावकर तहानलेले! मुंबईच्या गिरगाव परिसरात गेल्या महिन्याभरापासून भीषण पाणीटंचाई, नागरिक हैराण.
- मृत्यूवर मात! अडीच वर्षांच्या चिमुकलीला नागाचा दंश; हृदय बंद पडले असताना डॉक्टरांनी परत आणले मृत्यूच्या दाढेतून!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
- बीड हादरलं! परळीत जुन्या वादातून भरदिवसा युवकावर तलवार आणि धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; 'तुला जिवंत सोडणार नाही' म्हणत धमकावले
- बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठींच्या कुटुंबावर मोठा संकट! मोठ्या भावावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; प्रकृती अत्यंत चिंताजनक
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- आखाती देशांतील तणावाचा फायदा! भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची ऐतिहासिक विक्रमी आयात; ऊर्जा सुरक्षेसाठी मोदी सरकारची नवी रणनीती
- नवी दिल्ली: कडक सुरक्षा आणि अवघड प्रश्नपत्रिकेचे आव्हान; लाखो विद्यार्थ्यांची उपस्थिती!
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.

























Subscribe to my channel



