
Pune : कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यामध्ये प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असतात. विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य वाढविण्यासाठी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष ताकद पणाला लावत असतात. त्यासाठी महापालिका निवडणूक एक सदस्य वॉर्ड पद्धतीने घ्यायची, की बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने, हा कायम वादाचा विषय राहिला आहे. एक सदस्यीय वॉर्ड पद्धत कायम काँग्रेसला फायदेशीर राहिली. त्यामुळे काँग्रेसचा अट्टाहास याच पद्धतीने निवडणुका घेण्याकडे असतो. महाविकास आघाडीचे सरकार असताना तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय झाला. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे ठरवण्यात आले. या वेळी महापालिकांच्या निवडणुका या विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहेत. त्यामुळे प्रभाग पद्धतीचा हा राजकीय खेळ कोणाला तारणार, हे आगामी विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
मतदारांशी जास्तीत जास्त संपर्क साधण्यावर राजकीय पक्षांचा भर असतो. एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीत कमी मतदार असल्याने स्थानिक प्रभावी उमेदवाराचा विजय सुकर होतो. मात्र, त्याच उमेदवाराला बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये विजयी होण्यासाठी धडपड करावी लागते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आपली स्थानिक पातळीवरील ताकद पाहून महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कोणत्या पद्धतीने निवडणुका घ्यायच्या, हे ठरवत असतात. सत्ताधारी पक्ष तत्कालीन परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेतो. कारण, महापालिकेच्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे यश मिळाले आहे, हे पाहून विधानसभा निवडणुकांमध्ये रणनीती ठरवणे सोपे होते.
|
|
पुणे महापालिकेच्या आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येक सत्ताधारी पक्षाने त्या- त्या वेळची परिस्थिती पाहून महापालिकेच्या निवडणुका या कधी एकसदस्यीय पद्धतीने, तर कधी बहुसदस्यीय पद्धतीने घेतलेल्या दिसून येतात. ४ मार्च १९५२ रोजी पुणे महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. पहिल्या निवडणुकीत ६५ नगरसेवक निवडून आले. २० बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने ही निवडणूक झाली. त्या वेळेच्या २ लाख ६,२६८ मतदारांनी ६५ नगरसेवक निवडून दिले. नंतरच्या निवडणुकांत प्रभाग पद्धत बदलली नाही. मात्र, मतदारसंख्येत वाढ झाली.
महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीत नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ झाली. त्या वेळी प्रभाग २० होते. मात्र, नगरसेवक ७३ निवडून आले. मतदारांची संख्या ३ लाख ४५,२५० झाली होती. महापालिकेच्या १९७४ मध्ये झालेल्या पाचव्या निवडणुकीनंतर बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा अवलंब करण्यात आला. नगरसेवकांची संख्या होती ७५. या निवडणुकीनंतर पुढील काही निवडणुका एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात आल्या. सहावी सार्वत्रिक निवडणूक १९७९ रोजी झाली. त्या वेळी ७५ नगरसेवक निवडून आले. १९८५ मध्ये सातवी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या वेळी नगरसेवकांची संख्या ८५ होती. १९९२ मध्ये महानगरपालिकेची आठवी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या वेळी नगरसेवकांची संख्या १११ झाली. हे सर्व नगरसेवक एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडून आले होते. १९९७ रोजी नगरसेवकांची संख्या १२४ झाली.
सन २००२ नंतर पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यास सुरुवात झाली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ४१ प्रभागांतून १६२ नगरसेवक निवडून आले. त्यासाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यात आला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे महापालिकेत ५८ प्रभागांतून १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आल्यानंतर तीन सदस्यांऐवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ४२ प्रभागांतून १६६ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून स्थानिक पातळीवर ही व्यूहरचना आखली जाते. या वेळच्या महापालिकेच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रभाग पद्धतीचा खेळ कोणाला तारणार, हे स्पष्ट होणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



