
Pune : सराईत गुन्हेगाराकडून माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून हॉटेलमध्ये गोळीबार, सराइताकडूनच मॉलसमोर गोळीबार, रिक्षात, खाणीत ढकलून देत, गळा दाबून, दगडाने ठेचून, चाकूने गळा चिरून झोपेतच खून, वाहनांची तोडफोड, कोयता नाचवत दहशत, कोयत्याचा धाक दाखवून विनयभंग या मागील आठवड्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील घटना पाहिल्यानंतर उद्योगनगरीची गुन्हेगारनगरीकडे वाटचाल होऊ लागली की काय? अशी भीती शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीत होत असलेली वाढ रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत १८ पोलीस ठाणे येतात. आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ ११५ चौरस किमी इतके असून अंदाजे ४० लाख इतकी लोकसंख्या येते. आळंदी- मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. कारखानदारीमुळे शहराची उद्योग, कामगारनगरी अशी ओळख झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक शहरात उदरनिर्वासाठी स्थायिक होतात. त्यामुळे येथे झपाट्याने नागरीकरण होत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे गुन्हेगारीतही वाढ होताना दिसत आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊन सहा वर्षे उलटले. परंतु, गुन्हेगारी कमी करण्यात अपयश आल्याचे दिसते. त्याउलट दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे.
|
Pune : सोसायटीतील गणेशोत्सवात महिलांचा विनयभंग, लोणीकंद पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा |
मागील आठ दिवसांत गोळीबाराच्या दोन आणि खुनाच्या पाच घटना घडल्या. काळेवाडीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला. पोलिसांनी केवळ चौकशी करून नगरसेवकाला सोडले आणि सराइतालाही तत्काळ जामीन मिळाला. माथाडीचे काम मिळण्याच्या वादातून आणि दहशत माजविण्यासाठी सराईत गुन्हेगाराने वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर गोळीबार केला. काळेवाडी, बावधन, खेड, देहूरोड, तळेगाव एमआयडीसी अशा खुनाच्या पाच घटना घडल्या. पिंपळे गुरव व नवी सांगवीत दहशत माजविण्यासाठी दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केली. एवढेच नाही तर पत्ता सांगितला नाही म्हणून गतिमंद तरुणावर कोयत्याने वार केले. आरोपी तत्काळ पकडले जात आहेत. परंतु, गुन्हे घटत नाहीत. त्यात दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरांवरही गुन्हे घडताना दिसतात. गुन्हेगार पोलिसांनाही जुमानत नाहीत. पोलिसांचे वर्चस्व, धाक, भीती राहिल्याचे दिसून येत नाही. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना एक, दोन वर्षांसाठी हद्दीतून तडीपार केले जाते. मात्र, ही कारवाई ‘कागदावरच’ राहत असून तडीपारांचा शहरात वावर असल्याचे दिसून येते. अनेक गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचेही समोर येत आहे. बेकायदेशीरपणे पिस्तुलांचा वापर वाढला आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
निरीक्षकांच्या सतत बदल्या कशासाठी?
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सतत बदल्या केल्या जातात. पोलीस निरीक्षकाला पदभार स्वीकारल्यानंतर हद्द, गुन्हेगारांची माहिती होण्यासाठी चार ते पाच महिने लागतात. तोपर्यंत दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदली झालेली असते. हद्दीची माहिती होईपर्यंत बदली होत असल्याने गुन्हेगारी रोखण्यात अपयश येताना दिसत आहे. बदल्यांमुळे अधिकाऱ्यांची मक्तेदारी होत नसली तरी चार महिन्यांतच बदली नेमकी कशासाठी? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



