
Kolhapur : मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र शुक्रवारी प्रकाशित करण्यात आले आहे. १८ ऑगस्टपासून ते कार्यान्वित होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल. कोल्हापूरकरांच्या ५१ वर्षांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. मुंबई हायकोर्टात खटले दाखल असलेल्या हजारो पक्षकारांना दिलासा मिळालेला आहे. या लढ्याला 1974 मध्ये सर्वप्रथम प्रारंभ झाला होता, तब्बल ५१ वर्षानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या लढ्याला यश मिळाले आहे.
कोल्हापूर, सोलापूरसह सहा जिल्ह्यातील नागरिकांची ही फार जुनी मागणी होती. यासाठी मागील ५० वर्षांपासून लढा चालला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे तीन खंडपीठ होतेच. त्याला आता या सर्किट बेंचची जोड मिळाली आहे. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू होणार असल्याची घोषणा होताच, सहा जिल्ह्यातील नागरिक अन् वकिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
सर्किट बेंच म्हणजे काय?
सर्किट बेंच हे उच्च न्यायालयाचे एक उप-केंद्र असते. उच्च न्यायालयापासून दूर असलेल्या लोकांसाठी भौगोलिक क्षेत्रात स्थापन केले जाते. यामुळे त्या क्षेत्रातील लोकांना न्याय मिळवणे सोयीचे आणि जलद होते. सर्किट बेंचला मान्यता देण्याची प्रक्रिया ही कायदेशीर, प्रशासकीय आणि राजकीय विचारांवर आधारित असते. सर्किट बेंच स्थापन करण्याची मागणी प्रामुख्याने त्या भागातील लोकसंख्या, भौगोलिक अंतर आणि न्यायालयीन सुविधांचा अभाव यावर आधारित असते.
|
|
सर्किट बेंचचा सहा जिल्ह्यातील नागरिकांना काय फायदा होणार?
कोल्हापुरात मुंबई हायकोर्टचे बेंच आल्यामुळे सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांचे पैसे आणि वेळ वाचणार आहे. कोल्हापूरसह सहाही जिल्ह्यातील गेली अनेक वर्ष रखडलेली खटले सोडवण्यास मदत होणार आहे. पक्षकरांना करावा लागणारा प्रवास खर्च, राहण्याचा खर्च आणि मुंबईतील हायकोर्टातील वकिलांची भरमसाठ फी यापासून ही सुटका होणार आहे.
वकिलांचा जल्लोष
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात जाहीर झाल्याचे समजताच शुक्रवारी रात्री वकिलांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून एकच जल्लोष केला. वकिलांसह त्यांच्या संघटनांनी न्याय संकुल परिसरात तर विविध संघटनांनी शिवाजी चौकात रस्त्यावर उतरून जल्लोषात सहभाग घेतला. सर्किट बेंच संदर्भातील अधिसूचना काल सायंकाळी जाहीर झाली. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथल्या वकील आणि पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सर्किट बेंच सुरू झाल्याने कोल्हापूर भाजपचा जल्लोष
मुंबई हायकोर्टाचा सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्यामुळे कोल्हापुरात जल्लोष सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने या मागणीसाठी अनेक वर्ष पाठपुरावा केल्याने कोल्हापुरातील शिवाजी चौक परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला. भाजपाचे खासदार धनंजय महाडिक हे स्वतः या जल्लोषात सहभागी होऊन त्यांनी कोल्हापूरकरांना साखर पेढे भरवले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील पक्षकारांना आणि वकिलांना या सर्किट बेंचचा मोठा फायदा होणार आहे. गेली 25 वर्षाहून अधिक काळ भाजप आणि गेली दहा वर्षे महायुती कोल्हापूरला हायकोर्टचे सर्किट बेंच मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न करत होते. या प्रयत्नाला अखेर यश आल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




