
Kolhapur : मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र शुक्रवारी प्रकाशित करण्यात आले आहे. १८ ऑगस्टपासून ते कार्यान्वित होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल. कोल्हापूरकरांच्या ५१ वर्षांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. मुंबई हायकोर्टात खटले दाखल असलेल्या हजारो पक्षकारांना दिलासा मिळालेला आहे. या लढ्याला 1974 मध्ये सर्वप्रथम प्रारंभ झाला होता, तब्बल ५१ वर्षानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या लढ्याला यश मिळाले आहे.
कोल्हापूर, सोलापूरसह सहा जिल्ह्यातील नागरिकांची ही फार जुनी मागणी होती. यासाठी मागील ५० वर्षांपासून लढा चालला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे तीन खंडपीठ होतेच. त्याला आता या सर्किट बेंचची जोड मिळाली आहे. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू होणार असल्याची घोषणा होताच, सहा जिल्ह्यातील नागरिक अन् वकिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
सर्किट बेंच म्हणजे काय?
सर्किट बेंच हे उच्च न्यायालयाचे एक उप-केंद्र असते. उच्च न्यायालयापासून दूर असलेल्या लोकांसाठी भौगोलिक क्षेत्रात स्थापन केले जाते. यामुळे त्या क्षेत्रातील लोकांना न्याय मिळवणे सोयीचे आणि जलद होते. सर्किट बेंचला मान्यता देण्याची प्रक्रिया ही कायदेशीर, प्रशासकीय आणि राजकीय विचारांवर आधारित असते. सर्किट बेंच स्थापन करण्याची मागणी प्रामुख्याने त्या भागातील लोकसंख्या, भौगोलिक अंतर आणि न्यायालयीन सुविधांचा अभाव यावर आधारित असते.
|
|
सर्किट बेंचचा सहा जिल्ह्यातील नागरिकांना काय फायदा होणार?
कोल्हापुरात मुंबई हायकोर्टचे बेंच आल्यामुळे सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांचे पैसे आणि वेळ वाचणार आहे. कोल्हापूरसह सहाही जिल्ह्यातील गेली अनेक वर्ष रखडलेली खटले सोडवण्यास मदत होणार आहे. पक्षकरांना करावा लागणारा प्रवास खर्च, राहण्याचा खर्च आणि मुंबईतील हायकोर्टातील वकिलांची भरमसाठ फी यापासून ही सुटका होणार आहे.
वकिलांचा जल्लोष
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात जाहीर झाल्याचे समजताच शुक्रवारी रात्री वकिलांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून एकच जल्लोष केला. वकिलांसह त्यांच्या संघटनांनी न्याय संकुल परिसरात तर विविध संघटनांनी शिवाजी चौकात रस्त्यावर उतरून जल्लोषात सहभाग घेतला. सर्किट बेंच संदर्भातील अधिसूचना काल सायंकाळी जाहीर झाली. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथल्या वकील आणि पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सर्किट बेंच सुरू झाल्याने कोल्हापूर भाजपचा जल्लोष
मुंबई हायकोर्टाचा सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्यामुळे कोल्हापुरात जल्लोष सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने या मागणीसाठी अनेक वर्ष पाठपुरावा केल्याने कोल्हापुरातील शिवाजी चौक परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला. भाजपाचे खासदार धनंजय महाडिक हे स्वतः या जल्लोषात सहभागी होऊन त्यांनी कोल्हापूरकरांना साखर पेढे भरवले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील पक्षकारांना आणि वकिलांना या सर्किट बेंचचा मोठा फायदा होणार आहे. गेली 25 वर्षाहून अधिक काळ भाजप आणि गेली दहा वर्षे महायुती कोल्हापूरला हायकोर्टचे सर्किट बेंच मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न करत होते. या प्रयत्नाला अखेर यश आल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



