
Raj Thackeray speech on land sale in Raigad : आपल्या रायगडमध्ये कोण येतेय, कोण राहतेय, माहिती नाही. उत्तरेमधील अनेकांनी कोकणात जमिनीच्या जमिनी घेतल्या आहेत. आमच्या लोकांना इतके कळत नाही, यातून आपणच संपणार आहोत, असे म्हणत राज ठाकरे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली. तुमच्या जमिनी घेण्यासाठी आले तर जमिनी विकायच्या नाहीत, त्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून येणार असल्याचे सांगा, असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. पनवेलमधील शेकपाच्या मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. सत्ताधाऱ्यांना इशारा देताना मराठी माणसाला आवाहन केले. आपल्या जमिनी विकू नका, वेळीच सावध व्हा, असे राज ठाकरे म्हणाले.
आज आपण या गोष्टी वाचवल्या नाहीत, तर काहीच राहणार नाहीत. रायगडमध्ये अमराठी आमदार नगरसेवक निवडून येतील, त्याला वेळ लागणार नाही. आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. विमानतळावर १०० टक्के मराठी मुले-मुली कामाला लागले पाहिजेत, असे राज ठाकरे म्हणाले.
जमिनी विकू नका -
बाहेरचे उद्योगपती येणार जमिनी घेणार, वाटेल ते थैमान घालणार, आपल्याकडे काय राहणार.. जमिनी विकू नका. राज्य सराकरने अर्बन नक्षल कायदा आणलाय. तुम्ही जर कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतो, एकदा त्यांनी अटक करू देच, त्यांना दाखवतो. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग आणता येणार नाही. मराठी माणसाला सन्मान देऊनच उद्योग येतील, असे राज ठाकरे म्हणाले.
सर्वाधिक डान्सबार रायगडमध्ये -
सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये.. ते बंद झाले होते. तेही अमराठी लोकांचे आहेत. ते कसे काय सुरू आहे. रायगड जिल्हा आहे ना.. छत्रपतींची राजधानी आहे, इथे मग इथे हे काय सुरू आहे. छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत. तुम्हाला भरकटून टाकायचे आणि मूळ विषयावरून लक्ष विचलीत करायचे धंदे सुरू आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राला नख लावा, तुम्हाला दाखवतो -
मराठी आणि गुजराती लोकांची भांडणे लावायचे आणि त्यातून मते कशी काढू शकतो? त्यासाठी हे सत्ताधाऱ्यांचे सर्व सुरू आहे. पण आम्ही त्यावर लगेच रिअॅक्ट होणार नाही. तुम्हाला हवं ते आम्ही करणार नाही. तुमच्या कृतीमधून महाराष्ट्राला नख लागतेय, ते समजल्यावर अंगावर आल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
महाराष्ट्र विकून मोठं होऊ नका -
बाहेरच्या राज्यात आपल्याबद्दल लाजिरवाणे बालले जाते. मराठी माणसे विकत घेण्यासारखी आहेत, असं बोलले जातेय. मराठी माणसे विकली जातात. जर असे असेल तर छत्रपतींचे पुतळे कशासाठी ठेवायचे. त्यांनी काय शिकवले हे विसरलात का? ज्यावेळी स्वाभिमान शून्य माणसं उरतता तेव्हा फक्त जिवंत प्रेते उरतात, हे बाबासाहेब पुरंदरे यांचे वाक्य आहे. तुम्ही जिवंत प्रेतासारखं राहू नका. तुम्ही मोठं व्हा.. पण महाराष्ट्र विकून मोठं होऊ नका. जमिनी विकू नका, असे राज ठाकरे म्हणाले.
गुजरातमध्ये बिहारीवर अन्याय, ते दिसत नाही का?
गुजरातमध्ये दोन वेळा बिहारी लोकांना हाकलून दिले. पहिल्यांदा २० हजार लोकांना हाकलले. बिहारी लोकांना हाकलून दिले, त्या अल्पेश ठाकूर याची बातमी नाही. राज ठाकरे जेव्हा मराठीसाठी बोलते तेव्हा संकुचित कसा असू शकतो?
आपली राज्य व्यवस्थित ठेवायचं अन् दुसऱ्या राज्यामध्ये गोंधळ घालायचा. जागे राहा, कान-डोळे उघडे ठेवा सतर्क राहा.. महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, याची काळजी घ्या, असे राज ठाकरे म्हणाले.
आजार अन् राजकारण, काय म्हणाले राज ठाकरे?
हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचे राजकारण फारसे वेगळे नाहीत. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, ते सारखं सुरूच आहे. त्यावर आपण काय म्हणतो.. व्हायरल होता. सध्या महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतात. स्वातंत्र्य मिळण्याआधी १२ दिवस, ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष ३ ऑगस्ट १९४७ रोजी पक्षाची स्थापना झाली. स्वातंत्र्याआधी स्थापन झालेला पहिला पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहे. लाल ध्वजाच्या मंजावर २ भगवे ध्वज एकत्र आले आहेत. आमच्या मंचावर येऊन फक्त मराठीवर बोला असे जयंत पाटील यांनी सांगितले, असे राज ठाकरे म्हणाले.
मोदी-शाह यांचे गुजरात प्रेम, मग आम्ही का मराठीवर प्रेम करू नये -
रायगडमधी शेतकरी बरबाद होणार नाही, ते टिकवण्यासाठी काम करावे. मराठीसाठी तडजोड नाही, भुसेंनाही ठणकावून सांगितले.अनेक प्रकल्प गुजरातला गेले. मोदी-शाह यांना गुजराती प्रेम आहे, मग आपण का संकुचित राहणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तुम्ही महाराष्ट्रातून गुजरातला गेलात तर शेतजमीन विकत घेता येत नाही, असा कायदा केला आहे. देशाचे पंतप्रधान अन् गृहमंत्री गुजरातचे आहेत, त्या गुजरातमध्ये जाऊन जमीन विकत घेता येत नाही. प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करत असतो, आपण का करायचा नाही, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




