
Pune : श्रावणापासून गौरी, गणपतीच्या सण-उत्सवाच्या काळात दर वर्षी विड्याच्या पानाच्या दरात तेजी असते. पण, यंदा अतिपावसामुळे उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त, अशा स्थितीमुळे एका करंडीचा (तीन हजार पाने) दर १४०० ते १५०० रुपयांवर गेला आहे. दरातील तेजी दिवाळीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.
दर वर्षी श्रावण महिन्यापासून विड्याच्या पानांची दरवाढ सुरू होते. गौरी, गणपतीत दरात आणखी वाढ होते, ती दसऱ्यापर्यंत कायम असते. पितृ पंधरवड्यात दर उतरतात आणि दिवाळीत पुन्हा वाढतात. यंदा श्रावणापासून पानांची दरवाढ सुरू झाली. गौरी – गणपतीत त्यात मोठी वाढ झाली आहे.
पूजेसाठी आणि खाण्यासाठी मिरज तालुक्यासह महाराष्ट्र – कर्नाटकच्या सीमेवरून विड्याच्या पानांची आवक होते. पण, नेमक्या याच भागात जुलै-ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला आहे. प्रामुख्याने सांगलीत सरासरीपेक्षा सुमारे ६४ टक्के (६४० मिमी) जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टी, संततधार यामुळे पानमळ्यांत पाणी साचून राहिल्यामुळे विड्याच्या पानाच्या वेलीची मुळे कुजू लागली आहेत. वेली पिवळ्या पडू लागल्या आहेत. पानेही सडू लागली आहेत. त्यामुळे पानांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे, अशी माहिती मिरज (नरवाड ) येथील पानउत्पादक प्रभाकर नागरगोजे यांनी दिली.
|
Mumbai : राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; 'या' भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान? |
सण-उत्सवाच्या काळात पानाच्या एका करंडीला (तीन हजार पाने) सरासरी १००० ते १२०० रुपयांवर दर असायचा. यंदा तो १४०० ते १५०० रुपयांवर गेला आहे. मुळात पानांची आवकच कमी असल्यामुळे आणि वेलींचे नुकसान झाल्यामुळे नजीकच्या भविष्यात पानांची आवक फार वाढेल, असे दिसत नाही. त्यामुळे पितृ पंधरवड्यात दरात घट होण्याची चिन्हे नाहीत. दिवाळीपर्यंत विड्यांच्या पानांची दरवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरवाढ दिवाळीपर्यंत राहण्याचा अंदाज
अतिवृष्टी, संततधार यामुळे विड्याच्या पानाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. वेलींचे नुकसान झाल्यामुळे पाऊस कमी झाल्यावर लगेच पानांच्या उत्पादनात वाढीची शक्यता नाही. आवक कमी आणि मागणी जास्त, अशा स्थितीमुळे पानांची दरवाढ दिवाळीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. कलकत्ता, बनारस पानांची आवक आणि दर स्थिर आहेत, अशी माहिती पानाचे घाऊक विक्रेते नीलेश खटाटे यांनी दिली.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



