
Pune : महायुतीमधील कोणीही माझ्याशी बोलण्यास तयार नाही. महायुतीतील नेत्यांना माझी अडचण वाटत असेल तर त्यांनी तसे सांगावे, असे सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लवकरच ‘निर्णय’ घेणार असल्याचे जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमधून विद्यामान आमदारांना संधी देण्याचे संकेत दिले असल्याने महायुतीचे जागा वाटप झाले का, अशी विचारणा पक्षाच्या नेत्यांकडे करणार असल्याचे स्पष्ट करत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याची शक्यता असल्याने पाटील नाराज आहेत. त्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बावडा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली. सर्व गोष्टी सहन केल्या जातील. मात्र, अपमान सहन करणार नाही, असा इशारा देत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे त्यांनी जाहीर केले. पाटील म्हणाले की, आम्ही महायुतीचे घटक आहोत.
मात्र त्यानंतरही अजित पवार यांनी विद्यामान आमदारांना संधी देण्याचे संकेत दिले. त्यामुळे महायुतीचे जागा वाटप झाले का? अशी विचारणा पक्षाच्या नेत्यांकडे करणार आहे. महायुतीमधील कोणीही माझ्याशी बोलण्यास तयार नाही. विधानसभा निवडणूक आली की आमचे काय चुकते, याचा भाजप नेतृत्वाने विचार करावा. महायुतीतील नेत्यांना माझी अडचण वाटत असेल तर त्यांनी तसे सांगावे. मी अद्यापही कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र जनतेच्या मनात काय आहे, हे पाहून निर्णय घेतला जाईल.
|
|
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा इंदापूरमध्ये आली आणि त्यावेळी विद्यामान आमदारांना पुन्हा संधी देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये असूनही शासकीय कार्यक्रमात डावलण्यात येते, अशा शब्दांत पाटील यांनी अजित पवार यांच्याबाबतची नाराजी व्यक्त केली.
फडणवीस, बावनकुळे यांची भेट घेणार
भाजपमधून बाहेर पडण्याचा कोणताही निर्णय घेतला नसताना पक्षाच्या नेत्यांनी काही विधाने केली. ती का केली, हे मला समजले नाही. मी अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लवकरच कळविण्यात येतील आणि तसा निर्णय जाहीर केला जाईल. याबाबत फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेणार आहे. कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, हे मला माहिती आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



