
Pune : गणेशोत्सवासह विविध उत्सवांमध्ये वापरली जाणारी प्लास्टिकची फुले, रंगीत, नक्षीदार प्लास्टिकच्या माळा आणि सजावट साहित्यावर बंदीचा निर्णयच घेतला जात नसल्याने या वर्षीही बाजारपेठांमध्ये निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या फुलांचे असंख्य प्रकार दाखल झाले आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) आदेश देऊनही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक फुले, सजावट साहित्यावर बंदी घातलेली नाही.
प्रशासनाकडून दुर्लक्ष
प्लास्टिक बंदीबाबत प्रशासकीय पातळीवरच दुर्लक्ष होत असल्याने बाजारपेठेत एकल वापर प्लास्टिकची सर्रास विक्री होत आहे. काही वर्षांपूर्वी थर्मोकोल बंदी आल्यानंतर उत्सवातील सजावटीच्या साहित्यामध्ये प्लास्टिकचा वापर वाढत गेला. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी एकल वापर प्लास्टिकच्या (सिंगल यूज) वापरावर बंदी आणली. मात्र, त्या यादीत सजावट साहित्यातील निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचा समावेश झाला नाही. त्यामुळे या त्रुटीचा गैरफायदा घेऊन विक्रेत्यांनी या वस्तूंची विक्री सुरू ठेवली. प्रशासनानेही प्लास्टिक बंदीच्या जुन्या नियमावलीवर बोट ठेवून विक्रेत्यांवर कारवाईस टाळाटाळ केली.
एनजीटीचा आदेश
सजावट साहित्यातील प्लास्टिक फुलांचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) पुणे न्यायपीठासमोर दोन वर्षांपूर्वी दाखल झाली होती. प्लास्टिक फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत असल्याची सबब याचिकेत देण्यात आली होती. त्याची दखल घेऊन एनजीटीने या प्रकरणी केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी समिती स्थापन करून नियमावली तयार करण्याचे आदेश दिला होता. गेल्याच वर्षी मंडळाने समितीही नेमली; पण या समितीचे निर्देश अद्याप स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी सजावट साहित्याबाबत सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारली आहे.
|
Mumbai : अल्पवयीन मुलींवर अत्याचार, मुंबईतील दोन प्रकरणे उघडकीस |
‘यादीत समावेश नाही’
प्रशासकीय पातळीवरील अनास्थेचा फायदा घेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील दुकानांमध्ये असंख्य प्रकारचे निकृष्ट दर्जाचे प्लास्टिकचे सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. उत्सवादरम्यान वापरले जाणारे प्लास्टिकचे बहुतांश सजावट साहित्य ‘सिंगल यूज’ प्रकारात मोडते; मात्र केंद्र सरकारने बंदी आणलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये प्लास्टिकची फुले आणि या सजावट साहित्याचा समावेश केलेला नाही, त्यामुळे आम्हाला कारवाई करता येत नाही, या प्लास्टिकच्या रंगीत फुलांचा समावेश बंदीमध्ये करावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
फुले त्रासदायक आहेत कारण
- कृत्रिम फुलांसाठी प्रामुख्याने पॉलिथिनचा वापर होतो.
- केंद्र सरकारने शंभर मायक्रॉनच्या आतील पॉलिथिनवर बंदी जाहीर केली आहे.
- बाजारातील प्लास्टिकच्या फुलांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, पॉलिथिनची जाडी सरासरी २९ मायक्रॉन आढळली.
- या फुलांसाठी वापरलेले रासायनिक रंग पर्यावरणीयदृष्ट्या घातक आहेत.
- कालांतराने साहित्याचा रंग फिका होतो, हळूहळू प्लास्टिकचे तुकडेही होतात.
- निकृष्ट दर्जामुळे या प्लास्टिकचे लवकर विघटन होत नाही.
केंद्र सरकारच्या पातळीवर सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंची यादीमध्ये सजावटीच्या प्लास्टिक फुलांचा समावेश नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत या साहित्याचे वाढते उत्पादन आणि निकृष्ट दर्जा लक्षात घेऊन त्यावरील बंदीसाठी दोन वर्षांपूर्वी एनजीटीकडे याचिका दाखल झाली होती. न्यायाधिकरणानेही दखल घेऊन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासह आठ सदस्यांची समिती नेमली. मात्र, समितीने दिलेला अहवाल वर्ष उलटूनही एनजीटीपर्यंत सरकारने पोहोचवलेला नाही. या दिरंगाईमुळे बाजारपेठेत सिंगल युज सजावट साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू आहे. -
स्टिकच्या साहित्याने व्यापली बाजारपेठ
- विक्रेते म्हणतात, प्लास्टिकला दुसरा रास्त दरातील पर्याय नाही, त्यामुळे आम्ही विक्री करतो
- प्लास्टिकच्या वस्तूंचे प्रमाण दर वर्षी वाढतच आहे.
- प्लास्टिकच्या माळा, हार, झुंबर, मखरासाठी खांब, कळस, प्लास्टिकची मंदिरेही बाजारात उपलब्ध.
- लाइटच्या माळांमध्येही प्लास्टिकची फुले, पानांचा वापर वाढला.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




