
Pune : शहरातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यातच हे खड्डे भर पावसात बुजविल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांत अनेक जणांना गंभीर दुखापत होत आहे. अशा रुग्णांची संख्या आठवडाभरात २० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
शहरात पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले. या खड्ड्यांत दुचाकी आदळून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रामुख्याने दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहे. त्यामुळे अनेकांना हाड मोडणे, मणक्याला दुखापत अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाऊस सुरू असताना खड्डे बुजविण्याची मलमपट्टी करण्यात आल्याने आता ते पुन्हा उखडले आहेत. त्यातील खडी रस्त्यावर पसरून दुचाकी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे.
|
Pune : राज्यातील साडेचारशे जणांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस? आमदार बच्चू कडू यांच्याकडून शोध अभियान |
याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयात अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के म्हणाले, की रस्त्यावर दुचाकी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने हाडांशी निगडित तक्रारी या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. कंबरदुखी आणि पाठदुखी असा त्रास या रुग्णांना होत आहे. अपघातात गुडघे आणि खांद्याला दुखापत होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा रुग्णांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. अनेक वेळा गंभीर दुखापत असल्याने शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय राहत नाही. खड्ड्यांमध्ये बस आदळून मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याच्याही काही घटना घडल्या आहेत.
या विषयी अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद मोडक म्हणाले, की रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून हाडे मोडणे, अस्थिबंध फाटणे असे प्रकार वाढले आहेत. याच वेळी मानदुखी, कंबरदुखी असा त्रास वाहनचालकांना होत आहे. रस्त्यावर दुचाकीवरून पडल्याने गुडघ्याला गंभीर इजा होण्याचे प्रमाण अधिक आहे. या आठवड्यात असे ५ ते ६ रुग्ण दाखल झाले आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खोलीचा अंदाज न आल्यानेही दुचाकी अपघात घडत आहेत. अशा प्रकरणांमध्ये कंबर आणि मणक्याला दणका बसल्याने गंभीर इजा होत आहे.
काळजी काय घ्यावी?
- खराब रस्त्यांवरून जाताना वाहनाचा वेग कमी ठेवा.
- रस्त्यावरील खड्ड्यांतून वाहन सावधगिरीने चालवा.
- गंभीर दुखापत टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे.
- रस्ते निसरडे झाल्याने वाहन चालविताना काळजी घ्यावी.
शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. रस्त्यावरील खड्डे वेळच्या वेळी बुजवायला हवेत. बांधकामाच्या ठिकाणची रेती आणि वाळू रस्त्यावर पसरत असून, ते टाळायला हवे. रस्ते चांगले असतील तर हे अपघात टाळता येतील.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!



























Subscribe to my channel




