पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!

पुणे: मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर परिसरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पस हिरवा झेंडा दाखवला आहे. साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्ता या दरम्यान नवीन उड्डाणपूल आणि समतल विलगक (Grade Separator) उभारण्याच्या ७३.५२ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने अंतिम मंजुरी दिली आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आणि नियोजन:

वाहतूक कोंडीपासून सुटका: सध्या शिवाजीनगरमधून जुना पुणे-मुंबई रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी प्रामुख्याने वाकडेवाडी अंडरपासचा वापर केला जातो. मात्र, वाहनांच्या प्रचंड वाढलेल्या संख्येमुळे या भागात पीक आवर्समध्ये मोठी वाहतूक कोंडी होते. या समस्येवर हा उड्डाणपूल एक कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे.

 

कालावधी: पावसाळ्याचा कालावधी वगळून अवघ्या दीड वर्षांत (१८ महिन्यांत) या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

निधीची तरतूद: या प्रकल्पासाठी सुरुवातीला अर्थसंकल्पात तरतूद नसली तरी, निधीचे वर्गीकरण करून प्राथमिक कामांसाठी तरतूद करण्यात आली असून उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवण्यात येणार असून त्यानंतर टेंडर प्रक्रिया वेगाने राबवली जाईल.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *