People Lose Lives Crossing Railway Tracks in Pune Division within 1.5 Years.

पुणे: रेल्वे विभागात दीड वर्षात ५२३ प्रवाशांचा रुळ ओलांडताना मृत्यू शेकडो कुटुंबांचा आधार हरपला.

People Lose Lives Crossing Railway Tracks in Pune Division within 1.5 Years.  
पुणे: रेल्वे विभागात गेल्या दीड वर्षांत रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांनी एक भीषण वास्तव समोर आणले आहे. या कालावधीत तब्बल ५२३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ८७ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवाशांमध्ये असलेला 'शॉर्टकट' घेण्याचा धोकादायक कल या मृत्यूंना कारणीभूत ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नेमकी स्थिती काय?पुणे, दौंड आणि मिरज या स्थानकांचा परिसर अपघातांसाठी 'हॉटस्पॉट' बनला आहे. स्थानकावर किंवा रुळांच्या परिसरातून जाताना वेळ वाचवण्याच्या नादात अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडतात. मात्र, अचानक येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव
गमवावा लागतो.

प्रशासनाचे प्रयत्न: प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबविली जाते. रेल्वे ट्रॅकवर अधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अनेक ठिकाणी तारेचे कुंपण घालण्यात आले आहे आणि नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईही केली जाते.असे असूनही, प्रवाशांच्या बेजबाबदारपणामुळे ही आकडेवारी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे.

 

प्रशासनाचे आवाहन:रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहेरा यांनी स्पष्ट केले आहे की, रेल्वे रूळ ओलांडणे हा कायद्याने गुन्हा असून तो जीवावर बेतू शकतो.

प्रवाशांनी वेळ वाचवण्याचा शॉर्टकट न वापरता पुलाचा (FOB) वापर करावा आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *