मुंबई: राज्य सरकारने सन २०२६ मध्ये जाहीर केलेल्या नवीन शेतकरी कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून कर्जखाती निरंक करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून वेगाने राबवली जात आहे. मात्र, दुसरीकडे २०१७ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'तील सुमारे ६ लाख ६४ हजार शेतकरी तब्बल ९ वर्षे उलटूनही अद्याप प्रत्यक्ष लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
५,९७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी अडकला: कृषी व सहकार विभागाकडून मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार, २०१७ च्या योजनेअंतर्गत सर्व निकषांमध्ये पात्र ठरूनही राज्यातील सुमारे ६.५६ लाख कर्जखात्यांचा ५,९७४ कोटी ४९ लाख रुपये इतका मोठा निधी तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे अडकला आहे. अर्ज पडताळणी, बँकांची माहिती जुळणे (Aadhaar Seeded Data) आणि इतर त्रुटींमुळे या खात्यांवर प्रत्यक्ष रक्कम वर्ग होऊ शकलेली नाही.
पावसाळी अधिवेशनात ५०० कोटींची विशेष तरतूद: प्रलंबित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर रक्कम पाठवण्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली आहे.
शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष: नव्या कर्जमाफीचे वाटप होत असताना जुन्या योजनेतील पात्र शेतकरी मात्र आजही बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. नऊ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही थकीत कर्जाची रक्कम माफ न झाल्याने शेतकरी कर्जबाजारीच राहिले असून, त्यांना नवीन पीककर्ज मिळण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे २०१७ च्या योजनेतील संपूर्ण प्रलंबित ५,९७४ कोटी रुपयांचा निधी एकाच टप्प्यात वितरित करून सर्व पात्र शेतकऱ्यांना त्वरित दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



