
पुणे - पावसाने दिलेली ओढ अन् उन्हामुळे जिवाची काहिली होत असतानाही, विठुमाऊलीच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या लाखो वैष्णवजणांचा मेळा संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर सोमवारी पुण्यभूमीत दाखल झाला. कित्येक तास रस्त्यावर उभे राहून त्या एका क्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो पुणेकरांनी त्रिवेणी संगमाची ‘याची देही याची डोळा’ अनुभूती घेत हा क्षण हृदयात साठविला. प्रथेप्रमाणे पुणेकरांनी पालख्यांचे मोठ्या आनंदोत्सवात स्वागत तर केलेच, शिवाय आपल्या दारी आलेल्या वारकऱ्यांच्या पाहूणचाराला तितक्याच आनंदाने सुरुवात केली.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणेकरांकडून दरवर्षी मोठी जय्यत तयारी केली जाते. रांगोळ्यांच्या पायघड्यांपासून कमालीची स्वच्छता, वारकऱ्यांना मुक्कामासाठीची व्यवस्था, खाण्या-पिण्यासाठी नानाविध जिन्नसपासून ते त्यांचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री, रेनकोट यांसारख्या किती तरी वस्तु देण्यासाठीची ही तयारी होती. आळंदीहून प्रस्थान ठेवल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी पुणे शहरात आळंदी रस्त्यावरील कळस येथे दाखल झाली.
तर संत तुकाराम महाराज पालखी नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी बोपोडी येथे दाखल झाली. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दोन्ही पालखी सोहळ्याचे सन्मानपूर्वक स्वागत केले. विक्रम कुमार यांनी वारकऱ्यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप, संतोष वारुळे, किशोरी वारुळे आदी उपस्थित होते.
भगवा ध्वज हाती घेऊन दिंड्यांपुढे चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सानिध्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दुपारी फुलेनगर येथे भोजनासाठी थांबला. त्यानंतर दुपारी एक वाजता संगमवाडी येथे विसावा घेतल्यानंतर पालखीने पुढे प्रस्थान ठेवले. त्याचवेळी संत तुकाराम महाराज पालखीचे कासारवाडी येथे दुपारचे जेवण झाले. त्यानंतर वाकडेवाडीत दुपारी साडेचार वाजता पालखी विसाव्यासाठी थांबली.
सायंकाळी सहा वाजता तुकाराम महाराज पालखीचे शिवाजीनगर येथे आगमन झाले. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाही तेथे दाखल झाला. यावेळी पुणेकरांनी शिवाजीनगर येथे मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी अक्षरशः गर्दी केली होती. लहान मुले, वृद्ध, महिला पालखीतील पादुकांवर डोके ठेवून आशीर्वाद घेत होते. दोन्ही पालख्यांचे जंगली महाराज रस्त्यावर आगमन झाले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी पादुका चौकात आल्यानंतर प्रथेप्रमाणे पालखी थांबवून आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या भक्तीसागरात पालख्यांनी पुढे प्रस्थान ठेवले. जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, लक्ष्मी रस्त्याने संत तुकाराम महाराज पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात आली. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये आली. दोन्ही पालख्यांचे मंदिरात आगमन झाल्यानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत समाजआरती झाली. त्यानंतर हा पालखी सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यात विसावला.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




