
Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सध्या कांद्याच्य दरात वाढ होताना दिसत आहे. सोलापुरात कांद्याला प्रति किलोसाठी 40 ते 45 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक घटल्यानं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले आहेत. याचा मात्र, शेतकऱ्यांना फायदा होत असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील आठवड्यात कांद्याला होता 25 ते 30 रुपयांचा दर
सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. प्रति किलो कांद्याला 40 ते 45 रुपयेपर्यंतचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक घटल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले आहेत. मागच्या आठवड्यात सोलापुरात कांद्याला सरासरी 25 ते 30 रुपये प्रति किलोचा दर होता. आज मात्र भाव 40 ते 45 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. कांद्याला भाव मिळाला तरीही शेतकरी मात्र समाधानी नाहीत. कारण, कांद्याला चाळीस रुपये भाव मिळाला असला तरीही मागील आठ महिन्यांपासून चाळीत कांदा राहिल्याने त्याचे वजन घटले आहे. त्यामुळे कांद्याला प्रत्यक्ष 40 रुपये भाव मिळाला असला तरी कांद्याचे वजन घटल्याने आम्हाला फारसा फायदा नसल्याची माहिती कांदा उत्पदक शेतकऱ्यांनी दिली आहे.
|
Udayanraje Bhosale News : शिवप्रेमींनाे ! प्रतापगड भेट सुखावह होणार : उदयनराजे भाेसले |
नवरात्रीचा सण संपताच कांद्याच्या दरात वाढ
नवरात्रीचा सण संपताच कांद्यानं पुन्हा एकदा दराची झेप घेतली आहे. मागच्या दोन दिवसांपासून किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबई सह राज्यातील बहुतेक शहरांमध्ये कांद्याच्या भावानं अर्धशतकी मजल मारली आहे. त्यामुळं गृहिणींची चिंता वाढली आहे. नवरात्रीच्या दिवसात कांदा खाणं टाळलं जातं. बहुतेक हिंदू कुटुंबांमध्ये या नऊ दिवसांत जेवणात लसूण आणि कांदा वापरला जात नाही. तसंच, मांसाहार देखील केला जात नाही. त्यामुळं कांद्याचा वापर कमी होतो. त्यामुळं नवरात्रीच्या आधी कांद्याचा भाव काहीसा खाली आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा कांद्याचा भाव वधारू लागला आहे. त्यामुळं साठेबाजी वाढून भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कांद्याच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी 25 रुपयांवर विकला जाणारा कांदा आता 50 रुपयांवर गेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरासरी 1000 रुपयांपर्यंत जास्त भाव मिळत आहे.
कांद्याचे दर वाढले मात्र, टोमॅटोचे दर घसरले
दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. कारण, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतच सडून जात होता. दर नसल्यामुळं कांदा विक्रीस नेऊन त्याचा उत्पादन खर्चही निघणं कठीण होतं त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. अशातच आता कांद्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कांद्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी दुसरीकडं टौमॅटो उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. मागच्या दोन महिन्यापूर्वी टोमॅटोचे दर हे प्रतिकिलोसाठी 150 ते 200 रुपयांवर पोहोचले होते. आता मात्र दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या पाच ते दहा रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री केली जात आहे.
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट



























Subscribe to my channel




