
Nandurbar Migration : जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्याने दररोज रोजगाराच्या शोधात शेकडो परिवार स्थलांतर करत आहेत. दिवाळी सणानंतर येथील हजारो कुटुंब आपल्या चिमुकल्या मुलांसह शहराची वाट धरतात. रोजगारासाठी होणारं स्थलांतर रोखण्यासाठी सरकार आणि शासन अनेक उपययोजना करतं मात्र या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचं चित्र आहे.
नंदुरबार जिल्हा सातपुड्याचा पर्वतरांगांमध्ये वसलेला जिल्हा जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने येथील आदिवासी बांधव वर्षातील आठ महिने रोजगाराचा शोधात गुजरात राज्यात स्थलांतर करतात. दिवाळीनंतर जिल्ह्यातून स्थलांतराला सुरुवात होत असते. मात्र यावर्षीचा अपुरा पाऊस यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने मुलं बाळांसह स्थलांतर होत असल्याचे चित्र दिसत आहे.
|
Jarange-Patil Hunger Strike : मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे, सरकारला दिला 2 जानेवारीपर्यंतचा वेळ |
सुमनबाई वळवी म्हणतात, गावात कामधंदे नाही. रोजगार मिळत नाही. जी थोडी शेती आहे. ती पावसामुळे खराब झाली आहे. घरात पाच-सहा मुले आहेत. काम मिळालं तर त्यांना जेवण मिळेल नाहीतर ते उपाशी राहतील म्हणून आम्ही गाव सोडून जातो. गावात सरकारने कामधंदे उपलब्ध करून दिले तर आम्ही गुजरातला कशाला जाऊ? सध्या या गावात मोजक्या काही घरांमध्ये लोक राहत असल्याचं चित्र आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने दरवर्षी येथील कुटुंब आपल्या मुलां बाळांसह शहराची वाट धरतात. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये रोजगारासाठी गावाबाहेर पडलेली ही कुटुंब आता थेट मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा आपल्या गावाकडे येतील.
मुलांचं शैक्षणिक नुकसान
कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगारच मिळत नसल्याने ही कुटुंब दरवर्षी महानगरांमध्ये स्थलांतरित होतात. या महानगरांमध्ये गेल्यावर हाताला मिळेल ते काम करून ही कुटुंबं आपला उदरनिर्वाह करतात. सात ते आठ महिने स्थलांतरित झाल्यावर येथील शाळेत जाणाऱ्या मुलांचं ही मोठं शैक्षणिक नुकसान होतं. दिवाळी नंतर कुटुंबासोबत जाणारी चिमुकली मुलं आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडतात.
हजारो कुटुंबाचे स्थलांतर
ग्रामीण भागात रोजगारासाठी होणार स्थलांतर हा गंभीर प्रश्न असून हे स्थलांतर रोखण्यासाठी शासन आणि सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र या योजनांचा पुरेपूर फायदा येथील तळागाळातील गरजू कुटुंबांना झालेला आजही दिसून येत नाही. त्यामुळे रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतराचा आकडा कमी होताना दिसत नसून रोजगार हमी योजना, स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगारासाठी दिल जाणार कर्ज या योजनांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय. आज ही जिल्ह्यातील हजारो कुटुंब ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात शहरांकडे स्थलांतरित होणारी ही कुटुंब थेट पाऊस सुरू होण्याच्या अगदी काही दिवस आधी आपल्या घराकडे वळतात. नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतराचा प्रश्न अनेक वर्षापासून अनुत्तीर्ण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते जिल्ह्यातील स्थलांतराचा प्रश्न शासन दरबारी मांडण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचं दिसून येते.
शहर
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- मुंबई: महिला उद्योजिकांसाठी महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! पर्यटन व्यवसायासाठी मिळणार १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
महाराष्ट्र
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- मुंबई: महिला उद्योजिकांसाठी महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! पर्यटन व्यवसायासाठी मिळणार १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- मुख्यमंत्री विजय यांची 'नायक' स्टाईल कारवाई! दोन महिन्यांतच DVAC संचालक ए. अरुण यांची उचलबांगडी; सी. मदेश्वरींकडे धुरा
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड

























Subscribe to my channel




