नागपूर: 'स्वाईन फ्लू' (H1N1) संसर्गाचा धोका वेगाने वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा आणि महापालिका पूर्णपणे सतर्क झाली आहे. जानेवारी २०२६ ते आतापर्यंत म्हणजेच गेल्या ७ महिन्यांत नागपुरात स्वाईन फ्लूचे एकूण २५ रुग्ण नोंदवले गेले आहेत, तर या संसर्गामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष आणि चिंतेची बाब म्हणजे, या २५ रुग्णांपैकी तब्बल १५ रुग्ण एकट्या जुलै महिन्यातच समोर आले आहेत. या १५ रुग्णांपैकी १३ रुग्ण हे एकट्या नागपूर महानगरपालिका हद्दीतील असल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य व तीव्रता ओळखून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना आरोग्य प्रशासनाकडून सतर्कतेच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. फ्लूसारखी लक्षणे (ILI) आणि गंभीर श्वसन संसर्ग (SARI) असलेल्या रुग्णांवर विशेष व बारीक लक्ष ठेवणे, संशयित रुग्णांचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवणे तसेच रुग्णांवर वेळेवर योग्य औषधोपचार सुरू करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन व उपाययोजना:
प्रमुख लक्षणे: ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी परस्पर मेडिकल स्टोअरमधून औषधे आणून घेणे टाळावे.
हाय-रिस्क (उच्च धोका) गट: ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, ५ वर्षांखालील लहान बालके आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा इतर दीर्घ आजारपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या अध्यक्षखाली नुकतीच 'स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समिती'ची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन संशयित मृत्यूंच्या वैद्यकीय अहवाल व पुराव्यांची सखोल व कसून पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर, एका रुग्णाचा मृत्यू खरोखरच स्वाईन फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले, तर दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू इतर गंभीर आजारांमुळे (सहव्याधी) झाल्याचे समितीने जाहीर केले.
वाढत्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील खासगी रुग्णालयांवर कडक देखरेख ठेवली जात असून, औषधसाठा पूर्ण ठेवण्यावर आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक प्रचंड त्रस्त, महापालिकेचा १५ दिवसांत ११०० खड्डे दुरुस्त केल्याचा दावा
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल २८ वेळा पेपरफुटी; विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे: चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात"
- मुंबई: चार वर्षांपासून हरवलेला चिमुकला अखेर कुटुंबीयांकडे सुखरूप परतला; एमआयडीसी पोलिसांच्या उल्लेखनीय शोधमोहिमेमुळे लागला प्रकरणाचा छडा
महाराष्ट्र
- पुणे: रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक प्रचंड त्रस्त, महापालिकेचा १५ दिवसांत ११०० खड्डे दुरुस्त केल्याचा दावा
- कृष्णा नदीच्या पाण्यावरून नवा वाद पेटला! महाराष्ट्राच्या 'राधाकृष्ण सिंचन प्रकल्पा'ला कर्नाटकातील कन्नड संघटनांचा तीव्र विरोध; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र"
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल २८ वेळा पेपरफुटी; विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे: चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- छत्रपती संभाजीनगर: 'तुम्ही वेलकम हॉटेलला या'; विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीला बोलावून हॉटेलच्या रुममध्ये संपवले, खळबळजनक घटना!
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"

























Subscribe to my channel

