
Mumbai : देशातील पहिला एक्सप्रेस वे अर्थात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Yashwantrao Chavan Expressway) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या प्रवासाला अधिक वेळ लागतोय. आता सरकारकडून द्रुतगती महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून (state government) तब्बल १४२६० कोटींचा मेगाप्लान तयार करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आता आणखी ४ लेन वाढण्यात येणार आहे. ९५ किमीचा हा महामार्ग सध्या सहापदरी आहे. पुढील काही वर्षांत हा महामार्ग दहा पदरी होईल. त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरातील प्रवास आणखी सुपरफास्ट होईल.
९५ किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे या द्रुतगती मार्गावर आणखी चार पदरी मार्ग जोडण्यासाठी १४,२६० कोटी रुपये इतका अंदाजे खर्च येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने प्रसारमध्यमान सोबत बोलताना सांगितले. याबाबत एमएसआरडीसीकडून ( महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने चार लेन वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तर निविदा प्रक्रिया नियोजनानुसार पार पडतील. आणि २०३० पर्यंत एक्सप्रेसवेमध्ये चार नवीन लेन जोडल्या जातील, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितलेय.
|
|
मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा एक्सप्रेस वे १ एप्रिल २००२ रोजी सर्वसामान्यांसाठी खुला झाला. या द्रुतगती महामार्गावर सध्या सहा लेन आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या महामार्गावर दररोज ८० हजार ते एक लाख वाहनांची वाहतूक असते. विकेंडला अथवा सुट्ट्यांच्या काळात ही वाहतूक आणखी वाढते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूककोंडी फोडण्यासाठी २०२० मध्ये महामार्गावरील १९० वर्षे जुना अमृतांजन पूल पाडण्यात आला. पण वाहतूककोंडी काही कमी झाली नाही. त्यामुळे या महामार्गावर आणखी चार लेन वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
अडोशी बोगद्यापासून खंडाळा एक्झिटपर्यंतचा हा मार्ग सहा पदरी आहे. पण एक्सप्रेस वेचे सहा पदरी आणि जुना मुंबई-पुणे महामार्गाचे चार पदरी, असे महामार्ग १० पदरी वाहतुकीची सुविधा देतो, असे अधिकाऱ्याने सांगितले. मागील शुक्रवार-शनिवारी या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. पाच ते दहा किमीच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबतचा राग व्यक्त केला आहे. एका युजर्सने मुंबई-पुणे या प्रवासासाठी आठ तास लागल्याची तक्रार केली. तर दुसरा एक व्यक्ती म्हणाला की, यापेक्षा कमी वेळ जुना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने लागतो. त्याशिवाय टोलही कमी द्यावा लागतो. आपण नेमकी प्रगती करतो की मागे पडतोय, असा प्रश्न पडला आहे.
वाढती वाहतूककोंडी पाहून २०२० मध्ये हा महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता एमएसआरडीसीने १० लेनपर्यंत सुधारित प्रस्वात तयार केला आहे. वाढत्या वाहतुककोंडीमुळेच नव्हे तर मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे आणखी वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला हा एक्सप्रेसवे अपग्रेड करण्याची आवश्यकता असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने म्हटलेय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेला आणखी चार लेन जोडण्यासाठी १४,२६० कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येणार आहे. त्यापैकी राज्य सरकार ४०% योगदान देण्याची शक्यता आहे तर उर्वरित रक्कम निविदा देणार्या कंपनीकडून उचलली जाण्याची शक्यता आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




