
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन दररोज किमान दीड लाखांपेक्षा जास्त वाहने प्रवास करत असतात. सर्वप्रकारे हा महामार्ग महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण महामार्ग मानला जातो. एमएसआरडीसीद्वारे २००२ मध्ये हा ९४.५ किमीचा महामार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला होता. पूर्वी मुंबई-पुणे प्रवास करण्यासाठी चार ते पाच तास लागत असतं. तोच प्रवास आता दोन ते अडीच तासांवर आला आहे. पण वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एमसआरडीसीने या महामार्गाचे आठपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिणामी तेथे अपघात होण्याची भीती वाढत आहे. सध्याच्या सरासरी वाहनांची संख्या पाहता भविष्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक वाढू शकतो. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गाचे आठपदरीकरण करायचे ठरवले. फेब्रुवारी २०२४ मध्ये एमएसआरडीसीने आठपदरीकरणाचे काम सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडे मंजुरीचा प्रस्ताव पाठवला. पण त्या प्रस्तावाची मंजुरी न मिळाल्याने महामार्गाचे काम रखडले आहे.
|
Maharashtra Weather : पुढील ५ दिवस तापमानात मोठा बदल, कुठे पाऊस, कुठे थंडी, वाचा हवामानाचा अंदाज |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या आठपदरीकरणाच्या प्रकल्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) खास फायनान्शियल मॉडेल तयार केले आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ६०८० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचेही एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. महामार्गाचे काम सुरु करण्यासाठी लागणाऱ्या निधी उभारण्याबाबतचे दोन पर्याय त्यांनी राज्य सरकारसमोर ठेवले आहे.
त्यातील पहिला पर्याय म्हणजे राज्य सरकारने अर्थ संकल्पात तरतूद करुन निधी उपलब्ध करुन द्यावा. तर दुसरा पर्याय हा 'मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसूलीची कालमर्यादा वाढवून द्यावा', असा आहे. निधी उभारण्यासंबंधित एमएसआरडीसीने राज्य सरकारकडे दोन पर्याय सुचवले आहेत. त्यातील कोणता पर्याय सरकारद्वारे निवडला जाईल याकडे एमएसआरडीसीचे लक्ष आहे. मुख्यत: निधी उभारणीपूर्वी आठपदरीकरण प्रकल्पाच्या मंजुरी मिळावी यासाठीही मंडळाचे प्रयत्न सुरु आहेत. नव्याने स्थापन झालेल्या सरकारद्वारे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला लवकर मान्यता मिळेल अशी आशा एमएसआरडीसीला आहे.
शहर
- पुणे: 'दुकान उघडलंस तर ठार मारेन!' दारूसाठी पैसे मागितल्याचा राग; वाईन शॉप कर्मचाऱ्यावर बाटलीने जीवघेणा हल्ला
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- गोव्यात जन्म-मृत्यू नोंदणी आता पूर्णपणे ऑनलाइन; १ जुलैपासून केंद्रीय CRS पोर्टलवरूनच होणार सर्व प्रक्रिया!
महाराष्ट्र
- शक्तीपीठ' महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; ७ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार महा-धरणे आंदोलन!
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका! माहिती अधिकार नियमांतील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांचे पत्र
- पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रोडवर १५ दिवसांपासून वाहतेय मुतारीचे पाणी; प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर!
गुन्हा
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
- ऐरोली महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा! चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती सोनम डोंगरे आणि बाळाचा मृत्यू; नवी मुंबईत खळबळ!
- रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीची तस्करी करताना महाराष्ट्रातील दोन पोलीस छत्तीसगडमध्ये जेरबंद; खवल्या मांजराचे खवलेही जप्त!
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- आता आयुष्मान भारत योजनेची कामे होतील व्हॉट्सॲपवर; केंद्र सरकारचा 'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च!
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- कोकणात पावसाचा हाहाकार; ५ जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' कायम! केरळ ते महाराष्ट्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय.




























Subscribe to my channel

