
Mumbai : मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने दहिसरपासून मीरा रोड, ठाणे तसेच कल्याणपर्यंतच्या विविध मार्गांवरील नऊ मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीसाठी एकूण ४९८ कोटी ७४ लाख ९० हजार रूपयांच्या बिनव्याजी दुय्यम कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला या नऊ प्रकल्पांच्या उभारणीसाठी राज्य सरकारनं ५०० कोटी रूपयांचे बिनव्याजी कर्ज वितरित केलंय. प्रत्येक प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
|
|
मुंबई मेट्रो लाईन ५ म्हणजे ठाणे - कल्याण - भिवंडी या महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलीय. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ५० टक्के कर, १०० टक्के स्थानिक कर आणि जमिनीच्या खर्चासाठी एकूण १,३५२ कोटी २५ लाख रूपये दुय्यम कर्जाच्या स्वरूपात राज्य सरकारकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे. हे दुय्यम कर्ज टप्प्याटप्प्याने MMRDAकडून परतफेड करण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो लाईन ५ प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून राज्याच्या नगर विकास विभागाने ५२ कोटी ३८ लाख ६० हजार रूपये दुय्यम कर्जाच्या रूपात वितरित करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रो ६ म्हणजेच स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी विक्रोळी या मेट्रोसाठी ३२ कोटी ९५ लाख २० हजार रूपये वितरित केले आहेत.
मेट्रो मार्ग २ अ दहिसर पूर्व ते डीएन नगर प्रकल्पासाठी २८ कोटी ८९ लाख ७० हजार वितरित करण्यात आले आहेत. तसेच मुंबई मेट्रो २ ब डीएन नगर ते मंडाले प्रकल्पासाठी ११२ कोटी ८० लाख रूपये वितरित करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो मार्ग ४ वडाळा घाटकोपर मुलुंड कासारवडवली आणि मुंबई मेट्रो ४ अ कासारवडवली ते गायमुख प्रकल्पासाठी ९८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व प्रकल्पासाठी ४९ कोटी ६३ लाख २० हजार रूपये वितरित करण्यात आले आहे. तसेच गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड प्रकल्पासाठी ८६ कोटी १४ लाख ४० हजार रुपये वितरित करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो मार्ग १२ कल्याण ते तळोजा प्रकल्पासाठी एक कोटी ८ लाख ९० हजार रुपये निधी वितरित करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई मेट्रो ९ दहिसर ते मीरा रोड आणि मार्ग ७ अ अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी ६६ कोटी ७१ लाख ४० हजार वितरित करण्यात आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



