
Mumbai : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे. नुकतीच मेट्रो 3 अॅक्वा लाईन सुरू झाली असून, लवकरच मेट्रो 8 देखील धावणार आहे. दहिसर ते काशिमिरा दरम्यानचा मेट्रो मार्ग पूर्ण झाला असून, डिसेंबर अखेरपर्यंत त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. याच वाढत्या नेटवर्कमध्ये आता आणखी एका मेट्रोची भर पडत आहे. राज्य सरकारने मेट्रो 11 ला मंजुरी देत या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.
मेट्रो 11 ही गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा असा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 23,487.51 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मार्गिकेचा विस्तार, मेट्रो डेपो निर्माण आणि इतर संबंधित कामांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रो 4/4A (वडाळा–कासारवडवली–गायमुख) या मार्गिकेचा विस्तार करून वडाळ्यापासून गेटवेपर्यंत जोडणी करण्यात येणार आहे.
|
|
हा मार्ग एकूण 14.51 किमी लांबीचा असून, त्यावर 14 स्थानके असतील. यापैकी 13 स्थानके भूमिगत तर 1 स्थानक अॅट-ग्रेड असेल. हे काम राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण होणार आहे. ही मार्गिका वडाळा–शिवडी–फिरोजशाह मेहता रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–काळा घोडा मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचेल.
मेट्रो 11 कार्यान्वित झाल्यानंतर दक्षिण मुंबईत प्रवास करणे अधिक सोपे आणि जलद होईल. सध्या मेट्रो 4/4A चे काम अंतिम टप्प्यात असून, त्याचा विस्तार मंजूर झाल्यामुळे पुढील काही वर्षांत शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई लोकलवरील भारही लक्षणीय कमी होऊ शकतो.
सध्या मुंबईत 89 किमी मेट्रो नेटवर्क कार्यरत आहे. भविष्यात हे जाळे 337 किमी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एकूण 16 मेट्रो मार्गिका उभारण्याचा आराखडा असून, यामुळे मुंबईचा संपूर्ण वाहतूक अनुभव ‘स्मार्ट’ आणि आधुनिक होणार आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




