
Mumbai Indians Hardik Pandya: आयपीएल २०२४ मध्ये सध्या प्लेऑफसाठी चढाओढ सुरु आहे. पण याच दरम्यान हार्दिकच्या नेतृत्वाखालील चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या वरिष्ठ सदस्यांनी कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा एमआयचा निर्णय संघासाठी फारसा फलदायी ठरला नाही. ज्या कर्णधाराने मुंबईला ५ आयपीएलची जेतेपदं मिळवून दिली त्याला बाजूला करत हार्दिक पंड्याला कर्णधार केले खरे पण प्रत्येक सामन्यादरम्यान हार्दिकची हुर्यो उडवली.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार,मुंबई इंडियन्स संघाच्या वरिष्ठ खेळाडूंनी कोचिंग स्टाफला कळवले की, ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचं वातावरण नाही आणि याचे कारण म्हणजे हार्दिक पांड्याची नेतृत्व शैली.
एमआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मुंबई इंडियन्सची सध्यस्थिती ही नव्या नेतृत्त्वामुळे झालेली नाही, तर गेल्या १० वर्षांपासून रोहितच्या कर्णधारपदाची सवय असलेला संघ अजूनही कर्णधार आणि संघाच्या नेतृत्व शैलीच्या बदलाशी जुळवून घेत आहे. नेतृत्व बदल होणाऱ्या संघासाठी ही कायमचं एक समस्या राहिली आहे. खेळामध्ये असे प्रकार सातत्याने घडत असतात.”
|
|
एका सामन्यानंतर प्रशिक्षक वर्ग आणि काही खेळाडू यांची एक मीटिंग झाली. यामध्ये मुंबई संघाचा पूर्वीपासून भाग असलेले रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह अशा वरिष्ठ खेळाडूंचा समावेश होता. या मीटिंगदरम्यान खेळाडूंनी आपले विचार मांडले आणि संघाची कामगिरी का खालावली आहे, या कारणांवर चर्चा केली. यानंतर हे वरिष्ठ खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीसोबत व्यक्तिगत संवादही झाला.
तिलक वर्माच्या खेळावर प्रश्नचिन्ह
दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर हार्दिकच्या सामन्यानंतरच्या वक्तव्यामध्ये “match awareness” नसल्याबद्दल संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू तिलक वर्मावर टिपण्णी केली.
जेव्हा अक्षर पटेल डाव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या चेंडूविरूद्ध फटेकबाजी करणे हा अधिक चांगला पर्याय होता,” हार्दिकने सामन्यानंतर बोलताना सांगितले. “मला वाटते की आम्ही match awareness च्या बाबतीत थोडे मागे पडलो आणि हे देखील आमच्या पराभवाचे एक प्रमुख कारण होते.” संघाच्या अपयशासाठी एका खेळाडूला दोष दिल्याचे ड्रेसिंग रूममध्ये वाईट पडसाद उमटले, असे सूत्रांनी सांगितले.
या हंगामात मुंबईच्या ताफ्यात सारं काही आलबेल नाहीय, काहीतरी नक्कीच घडतं असल्याचे वक्तव्य अनेक क्रिकेट तज्ञांनी केले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने असे म्हटले आहे की संघ दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. ‘मला वाटते की त्या ड्रेसिंग रूममध्ये वेगवेगळे गट आहेत. त्यामुळे काही गोष्टी साध्य होत नाहीत. ते संघटित होत नसल्याने एक संघ म्हणून खेळू शकत नाहीत.’ असे क्लार्क म्हणाला.
मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्रँचायझी दरवर्षीप्रमाणेच या हंगामाचाही आढावा घेईल आणि गरज पडल्यास संघाच्या भविष्याचा विचार करत काही निर्णयही घेतले जातील.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा


























Subscribe to my channel


