
Mumbai Indians Hardik Pandya: आयपीएल २०२४ मध्ये सध्या प्लेऑफसाठी चढाओढ सुरु आहे. पण याच दरम्यान हार्दिकच्या नेतृत्वाखालील चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या वरिष्ठ सदस्यांनी कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा एमआयचा निर्णय संघासाठी फारसा फलदायी ठरला नाही. ज्या कर्णधाराने मुंबईला ५ आयपीएलची जेतेपदं मिळवून दिली त्याला बाजूला करत हार्दिक पंड्याला कर्णधार केले खरे पण प्रत्येक सामन्यादरम्यान हार्दिकची हुर्यो उडवली.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार,मुंबई इंडियन्स संघाच्या वरिष्ठ खेळाडूंनी कोचिंग स्टाफला कळवले की, ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचं वातावरण नाही आणि याचे कारण म्हणजे हार्दिक पांड्याची नेतृत्व शैली.
एमआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मुंबई इंडियन्सची सध्यस्थिती ही नव्या नेतृत्त्वामुळे झालेली नाही, तर गेल्या १० वर्षांपासून रोहितच्या कर्णधारपदाची सवय असलेला संघ अजूनही कर्णधार आणि संघाच्या नेतृत्व शैलीच्या बदलाशी जुळवून घेत आहे. नेतृत्व बदल होणाऱ्या संघासाठी ही कायमचं एक समस्या राहिली आहे. खेळामध्ये असे प्रकार सातत्याने घडत असतात.”
|
|
एका सामन्यानंतर प्रशिक्षक वर्ग आणि काही खेळाडू यांची एक मीटिंग झाली. यामध्ये मुंबई संघाचा पूर्वीपासून भाग असलेले रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह अशा वरिष्ठ खेळाडूंचा समावेश होता. या मीटिंगदरम्यान खेळाडूंनी आपले विचार मांडले आणि संघाची कामगिरी का खालावली आहे, या कारणांवर चर्चा केली. यानंतर हे वरिष्ठ खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीसोबत व्यक्तिगत संवादही झाला.
तिलक वर्माच्या खेळावर प्रश्नचिन्ह
दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर हार्दिकच्या सामन्यानंतरच्या वक्तव्यामध्ये “match awareness” नसल्याबद्दल संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू तिलक वर्मावर टिपण्णी केली.
जेव्हा अक्षर पटेल डाव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या चेंडूविरूद्ध फटेकबाजी करणे हा अधिक चांगला पर्याय होता,” हार्दिकने सामन्यानंतर बोलताना सांगितले. “मला वाटते की आम्ही match awareness च्या बाबतीत थोडे मागे पडलो आणि हे देखील आमच्या पराभवाचे एक प्रमुख कारण होते.” संघाच्या अपयशासाठी एका खेळाडूला दोष दिल्याचे ड्रेसिंग रूममध्ये वाईट पडसाद उमटले, असे सूत्रांनी सांगितले.
या हंगामात मुंबईच्या ताफ्यात सारं काही आलबेल नाहीय, काहीतरी नक्कीच घडतं असल्याचे वक्तव्य अनेक क्रिकेट तज्ञांनी केले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने असे म्हटले आहे की संघ दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. ‘मला वाटते की त्या ड्रेसिंग रूममध्ये वेगवेगळे गट आहेत. त्यामुळे काही गोष्टी साध्य होत नाहीत. ते संघटित होत नसल्याने एक संघ म्हणून खेळू शकत नाहीत.’ असे क्लार्क म्हणाला.
मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्रँचायझी दरवर्षीप्रमाणेच या हंगामाचाही आढावा घेईल आणि गरज पडल्यास संघाच्या भविष्याचा विचार करत काही निर्णयही घेतले जातील.
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!


























Subscribe to my channel


