मुंबई: महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी अशा मोठ्या योजनेची घोषणा केली. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी कधी होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्य सरकार ने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत केंद्र सरकारकडून इन्कम टॅक्ससंदर्भात डेटा मागवला आहे. ही माहिती येण्यास पाच ते सहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली असून सरकारकडून डेटा आल्यानंतरच या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. परिणामी पुढील आठवड्यात तरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार का, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. परंतु आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील. परिणामी सरकारला शेतकरी संघटनांच्या रोषाला पुन्हा सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ ५ जुलैनंतर काही दिवसात होणार असल्याचे सांगितले होते. तसेच या कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार असून 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे. याशिवाय नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर भत्ता देऊ असेही सरकारने सांगितले होते. मात्र सध्या राज्य सरकारने शेतकऱ्यांचा डेटा इन्कम टॅक्स डीपार्टमेंटकडे मागवल्यामुळे या प्रक्रियेस वेळ लागणार आहे. ज्यामुळे ही योजना आणखी लांबणीवर पडली आहे.
शहर
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




