
Marathwada Water Issue : पुढील दोन दिवसांत नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, अशी मागणी करत नांदूर मध्यमेश्वर धरणाजवळ आंदोलन करण्यात आले आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. त्याचबरोबर जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, यासाठी लेखी निवेदन अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
दरवर्षीं नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातून नाशिक पाणी सोडण्यात येते. हे पाणी आरक्षित करण्यात येत असून मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून 31 ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून आज किंवा उद्या हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच, 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकमधील काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी यास विरोध दर्शवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, या मागणीसाठी अमृता पवार यांच्या नेतत्वाखालील आंदोलन केले आहे.
|
|
यंदा नाशिक जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर निफाड व येवला तालुक्यातील नागरिकांना अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे, निफाड व येवला तालुक्याचे हक्काचे पालखेड धरणाचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणामार्गे जायकवाडी धरणात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे आता शासन याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात यावे यासाठी काही संघटनांनी आंदोलन देखील केल्याचे समोर येत आहे. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी मागणी लावून धरल्याने पाणी आवर्तनावर काय निर्णय होतो हे पाहावे लागणार आहे.
विविध धरणातून पाणी सोडण्याचा प्रस्ताव....
प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यासाठी किती पाणी सोडावे, यावरून जलसंपदा विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याने निर्णय घेण्यासाठी उशीर होत आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून पाणी सोडल्यावर हे पाणी जायकवाडी धरणात येईपर्यंत अंदाजे 30 टक्के पाण्याचा नुकसान होते. त्यामुळे, जायकवाडी धरणात साडेनऊ टीएमसी पाणी यावे, आणि यासाठी साडेबारा टीएमसी पाणी वरील विविध धरणातून सोडण्याचा प्रस्तावछत्रपती संभाजीनगरच्या अभियंत्यांनी दिला आहे. मात्र, जायकवाडीत साडेसात टीएमसी पाणी पोहोचावे, यासाठी 11 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे प्रस्ताव नाशिक विभागातील अभियंत्यांचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बैठकीत 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: पुरंदर विमानतळाचा प्रवास होणार सुसाट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दिवे घाटात होणार दुहेरी बोगदे!
- एक युग संपले: युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. कुमार सप्तर्षी काळाच्या पडद्याआड"
- चेंबूर वृक्ष दुर्घटना: पालिकेचा चौकशी अहवाल महापौरांनी फेटाळला; आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा इशारा
- खंबाटकी घाटात ऑइल टँकरला भीषण गळती; पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, मोठा अनर्थ टळला"
महाराष्ट्र
- पुणे: पुरंदर विमानतळाचा प्रवास होणार सुसाट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दिवे घाटात होणार दुहेरी बोगदे!
- एक युग संपले: युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. कुमार सप्तर्षी काळाच्या पडद्याआड"
- चेंबूर वृक्ष दुर्घटना: पालिकेचा चौकशी अहवाल महापौरांनी फेटाळला; आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा इशारा
- खंबाटकी घाटात ऑइल टँकरला भीषण गळती; पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, मोठा अनर्थ टळला"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: लग्नास नकार दिल्याचा संताप! तरुणीवर गोळीबार; आरोपी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- गुजरात: अहमदाबादच्या फटाका कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी
- उत्तर प्रदेश: 'रोजचा त्रास सहन होईना!'; २३ वर्षीय सुनेने ब्लेडने कापला सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; छेडछाडीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ


























Subscribe to my channel




