
Dharshiv : मराठवाड्यात गुरुवारी एकाच दिवशी तिघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता धाराशिव जिल्ह्यात देखील आणखी एकाने आरक्षणाच्या मागणीसाठी स्वतःच जीवन संपवला आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथील 47 वर्षीय शेतकऱ्याने मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नसल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी (27 ऑक्टोबर) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे. बळीराम देविदास साबळे (वय 47 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील गुरुवारी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धाराशिव जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी हा तिसरा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. डोमगाव येथील शेतकरी बळीराम देविदास साबळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साबळे घरातून शेतात जात असताना, 'आपल्याला काही आरक्षण मिळत नाही, मेल्यालं बरं', असे गावात बसल्यानंतर कांही ग्रामस्थांजवळ नैराश्येच्या भावनेतून बोलत होते. त्यानंतर दुपारी शेतात गेल्यावर एक वाजेच्या सुमारास त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
|
|
मराठा आरक्षणाचा निर्णय होत नसल्याने होते निराश...
बळीराम हे जेवण करण्यास घरी का येईनात म्हणून त्यांची पत्नी मिराबाई या शेतात गेल्या असता त्यांनी सर्वप्रथम ही घटना पाहिली आणि आरडा ओरड केली. ही माहिती समजताच कांही ग्रामस्थ शेतकरी घटनास्थळी पोहचले. त्यांचे चुलत भाऊ गणेश साबळे यांनी याबाबत परंडा पोलीस ठाणे व परंडा तहसीलदार यांना माहिती दिली आहे. बळीराम साबळे यांना दोन मुले आहेत. एक मुलगा ज्ञानेश्वर हा उच्च शिक्षण घेत आहे तर दुसरा मुलगा सिद्धेश्वर हा अपंग आहे. वडील अर्धांगवायु आजारामुळे घरातच आहेत. त्यांना केवळ दीड एकर शेती असून यातूनच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. आरक्षणाच्या मागणीसाठी ते आग्रही होते. परंतु, याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने ते निराश असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
आत्महत्या सत्र सुरूच...
मागील काही दिवसांत मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मराठवाड्यात गुरुवारी जालना येथील अंतरवाली टेंभी गावातील शिवाजी किसन माने (वय 45 वर्षे), छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर (वय 28 वर्षे) आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय 25 वर्षे) यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील बळीराम देविदास साबळे यांनी देखील आपलं जीवन संपवलं आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




