
Dharshiv : मराठवाड्यात गुरुवारी एकाच दिवशी तिघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता धाराशिव जिल्ह्यात देखील आणखी एकाने आरक्षणाच्या मागणीसाठी स्वतःच जीवन संपवला आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथील 47 वर्षीय शेतकऱ्याने मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नसल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी (27 ऑक्टोबर) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे. बळीराम देविदास साबळे (वय 47 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील गुरुवारी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धाराशिव जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी हा तिसरा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. डोमगाव येथील शेतकरी बळीराम देविदास साबळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साबळे घरातून शेतात जात असताना, 'आपल्याला काही आरक्षण मिळत नाही, मेल्यालं बरं', असे गावात बसल्यानंतर कांही ग्रामस्थांजवळ नैराश्येच्या भावनेतून बोलत होते. त्यानंतर दुपारी शेतात गेल्यावर एक वाजेच्या सुमारास त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
|
|
मराठा आरक्षणाचा निर्णय होत नसल्याने होते निराश...
बळीराम हे जेवण करण्यास घरी का येईनात म्हणून त्यांची पत्नी मिराबाई या शेतात गेल्या असता त्यांनी सर्वप्रथम ही घटना पाहिली आणि आरडा ओरड केली. ही माहिती समजताच कांही ग्रामस्थ शेतकरी घटनास्थळी पोहचले. त्यांचे चुलत भाऊ गणेश साबळे यांनी याबाबत परंडा पोलीस ठाणे व परंडा तहसीलदार यांना माहिती दिली आहे. बळीराम साबळे यांना दोन मुले आहेत. एक मुलगा ज्ञानेश्वर हा उच्च शिक्षण घेत आहे तर दुसरा मुलगा सिद्धेश्वर हा अपंग आहे. वडील अर्धांगवायु आजारामुळे घरातच आहेत. त्यांना केवळ दीड एकर शेती असून यातूनच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. आरक्षणाच्या मागणीसाठी ते आग्रही होते. परंतु, याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने ते निराश असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
आत्महत्या सत्र सुरूच...
मागील काही दिवसांत मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मराठवाड्यात गुरुवारी जालना येथील अंतरवाली टेंभी गावातील शिवाजी किसन माने (वय 45 वर्षे), छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर (वय 28 वर्षे) आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय 25 वर्षे) यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील बळीराम देविदास साबळे यांनी देखील आपलं जीवन संपवलं आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



