Godavari River : गोदावरी नदी कोरडी ठाक; जालन्यात गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई

Jalna : उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे. दरम्यान जालन्यात गोदावरी नदी देखील कोरडी ठाक पडल्यानं गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालीे आहे. गावात पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे जनावरांना पिण्यास पाणी देणे देखील आता जिकरीचे झाले आहे.

राज्यात सर्वदूर भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मार्च, एप्रिल महिन्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मुख्य म्हणजे वाढत्या तापमानामुळे तलाव, धरणातील पाणी पातळीत घट होत आहे. तर जमिनीतील पाण्याचे स्रोत देखील आटले आहेत. त्यानुसार जालन्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदी देखील कोरडी पडल्याने तीव्र पाणी टंचाईचा सामना परिसरातील गावांमध्ये करावा लागत आहे.

पाणी संकट गडद

जालना जिल्ह्यातल्या अनेक गावांमधून गोदावरी नदी वाहते. त्यामुळे गोदाकाठचे गाव ही गोदावरी नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. मात्र, यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरी कोरडी ठाक पडली आहे. गोदाकाठच्या नागझरी, खामगाव, सावळेश्वर, पिंपळगाव, गंगावाडी, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, शहागड, गोरीगंधारी, डोमलगाव, साष्ट पिंपळगाव, बळेगाव यासह अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे.

 

 

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *