
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमनंतर आता सरकारनंही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मोर्चाचं वादळ मुंबईवर धडकण्याआधीच राज्य सरकारकडून पडद्यामागे बऱ्याच हालचालींना सुरुवात झाली. जरांगे पाटील आणि मराठा मोर्चाच्या वादळाला रोखण्याची सरकारची रणनिती काय आहे ते जाणून घेऊया,
जरांगे पाटील यांच्याशी पडद्यामागून चर्चा सुरू
मनोज जरांगे यांना रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्याशी पडद्याआडून चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री स्वतः जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार हे आता पाहावं लागेल.
|
|
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आता आव्हान आहे ते मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचं. जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: पडद्यामागच्या चर्चेत सहभागी झालेत. राज्य सरकार सध्या आरक्षणासाठी काय काय प्रयत्न करतेय हे मनोज जरांगे पाटलांना पटवून देणं सध्या सरकारसाठी गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडून बच्चू कडू, उदय सामंत तर भाजपकडून गिरीश महाजन हे मनोज जरांगे यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. या विषयावर मुख्यमंत्री तातडीची बैठक बोलवणार असल्याचंही समजतंय.
मराठा आरक्षणाच्या आढाव्यासाठी विशेष बैठक
मराठा आरक्षणाकरता प्रशासकिय पातळीवर सरकारची काय प्रगती आहे याचा आढावा घेण्याकरता एक विशेष बैठक स्वतः मुख्यमंत्री लवकरच सह्याद्री अतिथी गृहात बोलवणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून मराठा समाजाला सरकार काय काय प्रयत्न करत आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न असेल. अधिकाऱ्यांना दिलेली कामे होत आहेत की नाही, राज्य सरकार आरक्षणाच्या दिशेने जात आहे की नाही, विशेष अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे घेतले जातील अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होईल आणि मराठा आरक्षणासंदर्भात तापलेलं वातावरणात दिलासा देण्याचा एक प्रयत्न केला जाईल.
शिंदे सरकारकडून मराठा आरक्षणाकरता काय प्रयत्न?
सरकारकडून नेमलेली शिंदे समिती तेलंगणाला जाऊन अभ्यास करणार आहे. कुणबी नोंदी, तेलंगणातील आरक्षण स्थिती यांचा अभ्यास समिती करणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची एक विशेष आढावा बैठक घेतली जाणार आहे.
आंदोलनाची धार कमी करण्याकरता एकीकडे पडद्यामागून सरकारच्या हालचाली सुरू असताना दुसरीकडे आंदोलनावेळी परिस्थिती चिघळू नये याकरताही सरकार दक्ष आहे.
मराठा मोर्चा पार्श्वभूमीवर राज्यभरातले पोलीस अलर्ट मोडवर
महाराष्ट्र राज्यात मराठा आंदोलकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. जरांगे पाटील यांनी तीन कोटी मराठा मुंबईत येतील असं जाहीर केलं आहे. आता लाखभर लोक जरी म्हटली तरी पोलीस प्रशासनाची तारांबळ उडेल त्यामुळे पोलिसांच्या विविध यंत्रणा आता ॲक्टिव्ह झाल्या आहेत.
पोलीस स्वतः आता मराठा आंदोलकांशी चर्चा करत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची समज सर्व आंदोलकांना देण्यात येतं आहे. तसेच राज्यातले गावागाताल्या मराठा आंदोलकांवर करड नजर पोलिसांची आहे. गुप्तचर यंत्रणेचे पोलीस या सर्व हालचालींवर नजर ठेऊन आहेत.
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शिंदे समितीचा तेलंगणा दौरा आणि अधिकाऱ्यांची विशेष बैठक या सर्व गोष्टी जरांगे पाटलांना रोखण्यासाठी कितपत फायदेशीर ठरेल? मराठा मोर्चाचं वादळ थोपवणं सरकारला शक्य होईल की मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रभर राजकीय वणव्याची सुरुवात होईल हे येणारा काळच सांगेल.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




