
Chandrashekhar Bawankule on opposition allegations over EVM Hack : सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करून, ईव्हीएम हॅक करून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा विरोधी पक्षांनी आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील तशी तयारी करण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत. शिवसेनेने (ठाकरे) देखील यावर विचार सुरू केला आहे. ईव्हीएमविरोधात मोठं आंदोलन उभारण्याच्या हालचाली शिवसेनेत (ठाकरे) चालू आहेत.
दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या या आरोपांवर भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक तुम्ही (काँग्रेस) जिंकलात, तिथे ईव्हीएम चांगले होते का? लोकसभेतही तुम्ही मोठं यश मिळवलं तेव्हा ईव्हीएम चांगले होते का?
चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना म्हणाले, “नांदेडची पोटनिवडणूक तुम्ही जिंकलात, आम्ही तिथे हरलो. जर ईव्हीएम हॅक करून मतं घेता आली असती तर आम्ही नांदेड लोकसभेतही तशी मतं घेतली नसती का? खरंतर हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावं. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केलं होतं.
|
|
त्या पराभवातून आम्ही शिकलो. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जे अपयश आलं, त्यानंतर आम्ही काही नव्या गोष्टी शिकलो. त्या पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केलं. पुढे काय करायचं ते ठरलं. रणनीती ठरली. आम्ही प्रत्येक बूथवर जाऊन काम केलं. मतदान केंद्रांवर जाऊन जनतेला भेटलो. त्यानंतर मतदानाचं प्रमाण देखील वाढलं.
विरोधकांना झोप लागलेली नाही : बावनकुळे
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केलं. मतदान केंद्रांवर मतदानाचे प्रमाण वाढलेलं दिसलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडला. परंतु, विरोधक जे काही बोलत आहेत तो त्यांचा खोटारडेपणा आहे. मला असं वाटतं दोन-चार दिवस त्यांना झोप लागणार नाही. जेव्हा त्यांची झोप लागेल, त्यानंतर त्यांचे डोक शांत राहील.
शहर
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
महाराष्ट्र
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
गुन्हा
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"

























Subscribe to my channel

