पंढरपूर:"विठूरायाला आपलं सगळं मागणं माहीत असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या बळीराजाला सुखी समाधानी ठेव आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे," असे मनःपूर्वक साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात शासकीय महापूजा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे ३ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास पारंपरिक विधीनुसार शासकीय महापूजा संपन्न झाली. या पवित्र पूजेदरम्यान सर्वप्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः आणलेला पारंपरिक व खास पोशाख विठूरायाला मोठ्या श्रद्धाभावाने परिधान करण्यात आला. यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजा करण्याचा बहुमान धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील माने दांपत्याला (मानाचे वारकरी) मिळाला होता.
पंढरपुरात भक्तीचा महासागर आणि विशाळ गर्दी:
विठ्ठलाच्या दर्शनाची आस बाळगून राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांमुळे सध्या संपूर्ण पंढरपूर नगरीत भक्तीचा महासागर उसळला आहे. वारकऱ्यांनी पवित्र चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी अलोट गर्दी केली आहे. सध्या पंढरपुरात २० लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आणि पत्रावरील दर्शनासाठी लागलेली दर्शनरांग तब्बल ५ किलोमीटरच्या पुढे गेली असून, भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी सुमारे १८ ते २० तासांचा अवधी लागत आहे.
भाविकांच्या सोयीसाठी प्रशासकीय तयारी:
लाखो भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाकडून अत्यंत चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या थकलेल्या आणि लांबपर्यंत रांगेत असलेल्या भाविकांना पिण्याचे पाणी, चहा आणि खिचडीचे वाटप सातत्याने केले जात आहे. प्रशासनाने 'वारकरी हाच खरा व्हीआयपी' मानून अनेक वयोवृद्ध वारकऱ्यांना थेट दर्शन घडवण्याबाबत विशेष खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळाले.
या पवित्र महापूजा सो्सारानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी विठुरायाचे मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य लाभणे हे माझ्यासाठी आणि समस्त महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठे सौभाग्य आहे. यावेळी त्यांनी विठ्ठल चरणी संपूर्ण राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. "हे पांडुरंगा, राज्यातील सर्व घटकांना सुखी ठेव, शेतकरी राजाला कधीही दुःखी करू नकोस, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम पाऊस पडू दे आणि सर्वांच्या आयुष्यात भरभराट व आनंद नांदो," अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
शहर
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

























Subscribe to my channel




