आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ साखळी फेरीतील आपला तिसरा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना रविवारी 15 फेब्रुवारीला होणार आहे. टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. मात्र पाकिस्तानला भारतात प्रवेश नाही. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यासाठी सहयजमान असलेल्या श्रीलंकेत जावं लागलं आहे. टीम इंडिया शनिवारी पहाटे श्रीलंकेत दाखल झाली. उभयसंघातील सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
दोन्ही संघ या स्पर्धेत अजिंक्य आहेत. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. मात्र या सामन्यादरम्यान पावसाची बॅटिंगही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामन्यातील काही वेळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना या पावसामुळे रद्द झाला तर दोघांपैकी कोणत्या संघाला फायदा होणार? हे जाणून घेऊयात.
हवामान कसं असेल?
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान पाऊस होण्याचा अंदाज आहे. दिवसा पाऊस होण्याची 65 टक्के शक्यता आहे. तसेच कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये दुपारी ढगाळ वातावरण असेल. तसेच दुपारनंतर पावसाची शक्यता कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 7 पर्यंत पावसाची शक्यता 50 टक्के आहे. त्यामुळे पावसामुळे चाहत्यांचा हिरमोड होणार असं चित्र पहायला मिळत आहे.
सामना रद्द झाल्यास काय?
भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 5-5 गुण होतील. दोन्ही संघांना तसा मोठा फरक पडणार नाही. मात्र दोन्ही संघांना सुपर 8 साठी साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागेल. दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. भारत आणि पाकिस्तानने 2 पैकी 2 सामने जिंकलेत. मात्र पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे.
भारत-पाकिस्तानसमोर कुणाचं आव्हान?
दरम्यान भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांसमोर त्यांच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात असोसिएट टीमचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया नेदरलँड्स तर पाकिस्तान नामिबिया विरुद्ध आपला शेवटचा साखळी फेरीतील सामना खेळणार आहे. त्यामुळे पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तरी फरक पडणार नाही. तसेच या सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूदही नाही.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




