आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ साखळी फेरीतील आपला तिसरा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना रविवारी 15 फेब्रुवारीला होणार आहे. टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. मात्र पाकिस्तानला भारतात प्रवेश नाही. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यासाठी सहयजमान असलेल्या श्रीलंकेत जावं लागलं आहे. टीम इंडिया शनिवारी पहाटे श्रीलंकेत दाखल झाली. उभयसंघातील सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
दोन्ही संघ या स्पर्धेत अजिंक्य आहेत. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. मात्र या सामन्यादरम्यान पावसाची बॅटिंगही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामन्यातील काही वेळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना या पावसामुळे रद्द झाला तर दोघांपैकी कोणत्या संघाला फायदा होणार? हे जाणून घेऊयात.
हवामान कसं असेल?
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान पाऊस होण्याचा अंदाज आहे. दिवसा पाऊस होण्याची 65 टक्के शक्यता आहे. तसेच कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये दुपारी ढगाळ वातावरण असेल. तसेच दुपारनंतर पावसाची शक्यता कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 7 पर्यंत पावसाची शक्यता 50 टक्के आहे. त्यामुळे पावसामुळे चाहत्यांचा हिरमोड होणार असं चित्र पहायला मिळत आहे.
सामना रद्द झाल्यास काय?
भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 5-5 गुण होतील. दोन्ही संघांना तसा मोठा फरक पडणार नाही. मात्र दोन्ही संघांना सुपर 8 साठी साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागेल. दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. भारत आणि पाकिस्तानने 2 पैकी 2 सामने जिंकलेत. मात्र पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे.
भारत-पाकिस्तानसमोर कुणाचं आव्हान?
दरम्यान भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांसमोर त्यांच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात असोसिएट टीमचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया नेदरलँड्स तर पाकिस्तान नामिबिया विरुद्ध आपला शेवटचा साखळी फेरीतील सामना खेळणार आहे. त्यामुळे पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तरी फरक पडणार नाही. तसेच या सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूदही नाही.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




