
Hinjewadi IT Park Traffic Jam : समस्येच्या सोडवणुकीच्या जबाबदारीबाबत सरकारी यंत्रणांनी एकमेकांकडे बोटे दाखवली, की समस्या कशी ‘जैसे थे’ राहते, याचा अनुभव सध्या हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे कर्मचारी घेत आहेत. आयटी पार्कमधील वाहतुकीची समस्या सोडविण्याची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी), आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीची, की पिंपरी-चिंचवड महापालिकेची हेच आता कळेनासे झाल्याचे चित्र आहे.
हिंजवडीतील आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दररोज हाल सुरू आहेत. या प्रकरणी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनसह अनेक संघटना सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना न झाल्याने पावसाळ्यात आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या आणखी वाढली. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले असून, पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचणे, खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण होणे असे चित्र दिसत आहे.
|
Pune : मुख्यमंत्रिपदाच्या ‘बिहार पॅटर्न’ची अफवा; अजित पवार यांचे स्पष्टीकरण |
या प्रकरणी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने ‘पीएमआरडीए’ आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसमवेत आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची नुकतीच पाहणी केली. सुरुवातीला यात ‘एमआयडीसी’कडे बोट दाखविण्यात येत होते. मात्र, पाहणीत ‘पीएमआरडीए’शी निगडित अनेक गोष्टी कोंडीसाठी कारणीभूत असल्याची बाब समोर आली. यानंतर ‘पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम करणाऱ्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीला नोटीस बजावली. प्रत्यक्षात या मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’च्या देखरेखीखाली सुरू असताना अशी नोटीस बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रत्येक यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने कोंडी वाढत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने शोधलेली कोंडीची कारणे
मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यांच्या कडेच्या असलेल्या नाल्यात टाकून ते बुजविण्यात आले.रस्त्याच्या कडेला राडारोड्याचे ढीग टाकण्यात आल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी साचत आहे.पीएमआरडीएने रस्त्याच्या कडेला बांधकाम परवानग्या दिल्या. परंतु, बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यापेक्षा उंचीवर बांधकाम केल्याने पाणी साचत आहे.बांधकाम परवानग्या दिल्यानंतर त्यांच्यावर ‘पीएमआरडीए’ने योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवले नाही.ग्रामपंचायतींच्या हद्दीत सांडपाणी व्यवस्था नाही.अनेक ठिकाणी बांधकामांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात आहेत. मेट्रोच्या कामासाठी काही रस्ते ताब्यात घेण्यात आले आहेत. मेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीची आहे. हे रस्ते सुस्थितीत आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याचे कामही त्यांचेच आहे.हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’च्या देखरेखीखाली सुरू असले, तरी रस्त्यांची खराब अवस्था झाल्याने कंत्राटदार कंपनीला नोटीस बजवावी लागली. रस्ते व्यवस्थित ठेवण्याचे काम कंत्राटदार कंपनीचे आहे. त्यांच्याकडून आता रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.सध्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडकडून रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यांवर पाऊस पडल्यास पाणी वाहून जाण्यास मार्ग नाही. त्यामुळे तिथे पुन्हा पाणी साचून हे रस्ते खराब होणार आहेत. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था प्राधान्याने करायला हवी होती. मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून केवळ वरवरची मलमपट्टी केली जात आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

