मुंबई: "देशातील सत्ताधाऱ्यांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजेत. ट्रम्प यांनी धमकी दिल्याने 'ऑपरेशन सिंदूर' थांबवले गेले, पण आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे," अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
निवडणुकीसाठी भाजपचा 'प्लॅन' तयार
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, केंद्राला बंगालमध्ये हिंसाचार पेटलेला हवा आहे, जेणेकरून त्याचे लोण देशभर पसरेल. "ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे की कपट रचून त्यांचा पराभव घडवण्यात आला. १०० जागा लुटल्या गेल्या आणि ९० लाख मते कापली गेली. भाजपला देशभर आग लावायची आहे आणि पुढील दोन वर्षांत अशांतता निर्माण करून लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, हाच त्यांचा प्लॅन आहे," असा दावा राऊत यांनी केला.
राज्यपालांच्या भूमिकेवर कडक टीका
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर बोलताना राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तामिळनाडूमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले जात नाही, यावरून त्यांनी भाजपवर 'कोश्यारी' वृत्तीचे राज्यपाल नेमल्याची टीका केली. पंजाबमधील स्फोटांचा संदर्भ देत त्यांनी भाजप निवडणुकांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, असेही म्हटले.
हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर भाजपचेच नाव नाही
नाशिकच्या काळाराम मंदिरातील कार्यक्रमावरून राऊत यांनी भाजपच्या हिंदुत्वावर सडकून टीका केली. "माजी राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजा फडकवून भाजपने हिंदुत्वावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. भाजपला असे वाटते की जगातील हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर केवळ त्यांचेच नाव आहे. काळाराम मंदिराचा संबंध शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी आहे, या कार्यक्रमाला ठाकरेंना किंवा त्या कुटुंबातील कोणालातरी बोलवायला हवे होते," असे ते म्हणाले.
'हनुमाना'चा अवमान करू नका
अयोध्या आणि नाशिकमधील धार्मिक प्रतिकांच्या वापरावरून राऊत यांनी भाजपला सुनावले. "धर्मध्वजावर हनुमानाचे चित्र लावले जाते, हनुमान निष्ठावान होते पण तुम्ही सर्व 'गद्दार' तुमच्या पक्षात घेतले आहेत. तुमच्या पक्षातील लोक हनुमान आहेत का? आमच्याकडील सर्व हनुमान तुम्ही पळवले आहेत, आता तरी हिंदुत्वाला बदनाम करणे थांबवा," असा टोला त्यांनी लगावला.
कुंभमेळ्याच्या बजेटवरून सवाल
नाशिक कुंभमेळ्यासाठी ३ लाख कोटींचे बजेट असल्याच्या बातम्यांवर राऊत यांनी शंका उपस्थित केली. "इतक्या मोठ्या रकमेचे नक्की काय काम होणार? की केवळ गुजरातच्या ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी हा आकडा फुगवण्यात आला आहे? कुंभमेळा मंत्र्यांनी ३५ हजार कोटींच्या कामांचा हिशोब स्पष्ट करावा," अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान


























Subscribe to my channel




