
Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी भारतातील युपीआय (UPI) प्रणालीचं कौतुक केलं आहे. तसेच भारताच्या विकासाबाबत बोलताना भारत खरोखर अपेक्षेपेक्षा वेगाने पुढे जात असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. एआयचा अग्रगण्य वापर, प्रगत शेती, जैविक खते, उत्तम बियाणे अशा विविध समस्यांना देशांतर्गत मदत करणाऱ्या नावीन्यपूर्णतेसाठी भारत हे नवनिर्मितीचं महत्त्वाचं केंद्र बनत आहे, असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.
मुंबईत एक्सप्रेस अड्डा या इंडियन एक्स्प्रेसच्या विशेष कार्यक्रमात गुरुवारी बिल गेट्स यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भारतातील विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. भारताकडून अधिकाधिक नावीन्यपूर्ण संकल्पना येत आहेत, हे अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने पुढे जात असल्याचा मला आनंद आहे, असंही बिल गेट्स यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच पुढील १५ वर्षांत भारताकडून विकासासाठी पुरेशी आर्थिक मदत अपेक्षित असल्याचं म्हणत त्यांनी देशांच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षमतेवर भर दिला.
हवामान बदलाशी लढण्यासाठीच्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्याबाबतीत विकसनशील देश खूप चांगलं काम करत आहेत हे पाहून आश्चर्य वाटतं का? असा प्रश्न विचारला असता बिल गेट्स यांनी म्हटलं की, जागतिक तापमानवाढीशी लढण्यासाठी फारसे देश वचनबद्ध नाहीत. खरं तर अलिकडच्या काळात अधिक ऊर्जा पुरवणं आणि तापमान कमी करणं ही उद्दिष्टे एकमेकांशी संघर्षात आली आहेत.
|
|
भारत २०३० पर्यंत ५० टक्के ऊर्जा नैसर्गिक स्रोतांद्वारे पुरवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. हे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. यावर बिल गेट्स यांनी म्हटलं की, विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. तसेच ऊर्जा क्षेत्र अनुकूल स्थितीत आहे, कारण भारत या क्षेत्रात प्रगती करत आहे. चीन उर्जेच्या क्षेत्रात जागतिक आघाडीवर आहे. तसेच भारत निश्चितपणे त्यानंतर दुसरा असेल. भारताकडे आता स्वस्त सौर पॅनेल आणि बॅटरीसाठी ब्लू प्रिंट आहे, ज्याचे अनुसरण करू शकते किंवा त्यांच्याशी स्पर्धा करू शकते. एआय क्षेत्रातील वाढीमुळे आणि ग्लोबल साउथच्या वाढत्या आकांक्षांमुळे ऊर्जेची मागणी वाढत असल्याने जगाला काही आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं.
तसेच बिल गेट्स यांनी असंही म्हटलं की चीन आणि यूएस दरम्यान चालू असलेल्या तणावामुळे व्यापारात अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच मदत कमी करून विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात अमेरिकेची कमी होत चाललेली भूमिका अधोरेखित करताना भारत ही भूमिका पूर्ण करू शकेल का? असं विचारलं असता बिल गेट्स म्हणाले की, पुढील १५ वर्षात भारताकडून विकासासाठी भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा असल्याचं सांगत देशातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची क्षमता त्यांनी अधोरेखित केली.
“इतर देशांना मदत करण्याच्या भारताच्या भूमिकेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा. कारण बँकिंग किंवा सरकारी लाभ हस्तांतरित करण्याकडे पाहिलं तरी ही एक अद्भुत गोष्ट आहे. ते म्हणाले की यामुळे स्टार्ट-अप्सच्या परिसंस्थेला भरभराटीसाठी पाया मिळाला आहे. भारत एक नवनिर्मितीचं महत्त्वाचे केंद्र बनेल अशी आशा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अग्रगण्य वापर, प्रगत शेती, जैविक खते, चांगले बियाणे, प्राण्यांचे अनुवंशशास्त्र या सर्व समस्यांना देशांतर्गत मदत करणाऱ्या नवोपक्रमाचा भारत एक महत्त्वाचा स्रोत ठरणार असल्याचं दिसून येत आहे”, असंही बिल गेट्स म्हणाले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



