
Mumbai : केंद्र सरकारच्या कामगार व शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांविरोधात आज, १२ फेब्रुवारी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर दुपारी तीन वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला.
महाराष्ट्रात कामगार, कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली इंटक, आयटक, एचएमएस, सीटीयू, एनटीयूआय, भारतीय कामगार सेना, एआयसीसीटीयू, एआयबीईए, बीईएफआय, एआयआयईए, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, श्रमिक एकता मंच, कामगार एकता, स्वतंत्र फेडरेशन आदी २०हून अधिक संघटना एकवटल्या आहेत.
‘कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार कठोर, निगरगट्ट मनाचे झाले आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला आता दिल्ली दरबारी संसदेत खासदारांद्वारे जागे करावे लागेल. मुंबईसह देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील एनटीसीच्या २३पेक्षा अधिक गिरण्या गेली पाच वर्षे बंद आहेत. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपासमारीला अंत उरलेला नाही. २९ जुने सक्षम कामगार कायदे रद्द करून, चार कामगार संहिता केंद्र सरकारने लागू केल्या आहेत. त्यामुळे कामगारवर्ग अडचणीत आला आहे,’ असे ते म्हणाले.
‘कामगार संघटनांनी शंभर वर्षांच्या लढ्यातून मिळविलेले कामगार हिताचे २९ कायदे विद्यमान केंद्र सरकारने रद्द करून चार कामगार संहिता लागू केल्या आणि कामगार वर्गाचे भविष्यच अंधारात आणले,’ असा आरोप महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केला.
हे कामगार सहभागी होणार
बँका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, फेरीवाले, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, बस, रिक्षा, टॅक्सी, असंघटित कामगार आदी विविध क्षेत्रांतील कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे संयुक्त कृती समितीने म्हटले आहे. आंदोलन शांततेत पार पाडण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
काय बंद?
सार्वजनिक वाहतूक, बॅंकिंग, विमा सेवा, सरकारी कार्यालय, बाजारपेठा, दुकानं, शाळा-महाविद्यालयं
काय सुरु?
रुग्णालय, औषधांची दुकानं, रुग्णवाहिका आरोग्यसेवा, दूध भाजीपाला पुरवठा, अग्निशमन आपत्कालीन सेवा, वीज पाणीपुरवठा
महाराष्ट्र काँग्रेसचा पाठिंबा
भारत बंदला महाराष्ट्र काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. 'कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहोचली आहे. या बदलांमुळे कामगारांच्या रोजगारसंधी कमी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनाही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्राचे धोरण शेतकरी आणि कामगारविरोधी असल्याने त्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत,' अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


