Loan Waiver Relief: 55 Lakh Farmers Covered, But Will Only 5 Lakh Get Full ₹2 Lakh Benefit?

मोठा दिलासा की केवळ आकड्यांचा खेळ? ५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, पण पूर्ण २ लाखांचा लाभ फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच?

Loan Waiver Relief: 55 Lakh Farmers Covered, But Will Only 5 Lakh Get Full ₹2 Lakh Benefit?नागपूर : राज्य सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' जाहीर करून राज्यातील ५५ लाख ७२ हजार पीककर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पूर्ण कर्ज माफ केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी या कर्जमाफीच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता एक वेगळीच वस्तुस्थिती समोर येत आहे. घोषणा जरी ५५ लाख शेतकऱ्यांसाठी असली, तरी प्रत्यक्ष पूर्ण २ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे योजनेचे गणित? राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत एकूण ५५ लाख ७२ हजार शेतकरी पात्र ठरत आहेत. मात्र, या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज सारखे नाही. कर्जमाफीच्या एकूण लाभार्थ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज हे अतिशय कमी रकमेचे आहे.

  • ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज असणारे शेतकरी: पात्र शेतकऱ्यांपैकी सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांचे पीककर्ज हे ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांना ५० हजारांच्या आतच कर्जमाफी मिळेल.

  • ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी: अंदाजे १५ लाख शेतकरी या गटामध्ये मोडतात, ज्यांचे कर्ज ५० हजार ते १ लाख रुपयांच्या दरम्यान थकबाकीत आहे.

  • १ लाख ते २ लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी: पूर्ण २ लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीच्या परिघात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ ५ लाखांच्या आसपास आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मर्यादित लाभ या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, राज्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यांची कर्ज घेण्याची क्षमता आणि बँकांकडून मिळणारे पीककर्ज हे मुळातच ५० हजार रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे दोन लाख रुपयांच्या मर्यादेची घोषणा झाली असली, तरी तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या कर्जमाफीवरच समाधान मानावे लागणार आहे. परिणामी, संपूर्ण २ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष आणि कमाल लाभ मिळणारे शेतकरी केवळ ५ लाख म्हणजेच एकूण लाभार्थ्यांच्या फक्त १० टक्क्यांच्या आसपास असणार आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *